शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

महायुतीतील घटक पक्ष ज्यांच्या जागा तेच लढविणार- चंद्रशेखर बावनकुळे

By विश्वास मोरे | Updated: October 11, 2023 22:41 IST

लोकसभेच्या जागांबाबत ११ पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय

विश्वास मोरे, पिंपरी : महाराष्ट्रातून लोकसभेच्या ४५ जागा आणण्याचा संकल्प महायुतीने केला आहे. ज्यांच्या ज्या जागा आहेत, तेच लढविणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह ११ पक्ष एकत्रिपणे येऊन लोकसभेच्या जागांबाबत चर्चा केली जाणार आहे, आम्ही एकजूटीने निवडणूक लढविणार आहोत, जिंकणार आहोत, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांनी काळेवाडीत व्यक्त केला.

भाजपाच्या वतीने घरचलो अभियान आणि युवा वॉरीयर्स संवादासाठी बावनकुळे पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. अभियानाविषयी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, ‘‘भाजपाच्या वतीने लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनाने केलेल्या कामांचा माहिती दिली जाणार आहे. अभियानास चांगला प्रतिसाद मिळत आहे. महायुती म्हणून जनतेसमोर जायचे आहे. लोकसभेची कोणती जागा कोण लढवेल. याची चर्चा आताच करणे योग्य नाही. महायुतीतील घटक पक्षांच्या ज्या-ज्या जागा असतील तेच लढविणार आहेत. भाजपाची जी जागा आहे तिथे भाजपा, राष्टÑवादीची आहे, तिथे घड्याळ आणि जी शिवसेनेची आहे. तिथे धनुष्यबान चिन्हांवर निवडणूक लढवून पंतप्रधान मोदींचे हात मजबूत करण्यासाठी महायुती प्रयत्न करणार आहे. आता कोण कोणती जागा लढविणार यापेक्षा ४५ खासदार निवडूण आणायचे हाच महायुतीचा संकल्प आहे.’’

आमदार आहेत, डावलण्याचा प्रश्नच येत नाही!

आमदार अश्विनी जगताप यांनी प्रॉटोकॉल पाळला जात नाही, याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यावर बावनकुळे यांना विचारले. बावनकुळे म्हणाले, ‘मी या प्रकाराची माहिती घेतली. आमदारांच्या विधानाचा विपर्यास केला आहे. त्या लोकप्रतिनिधी आहेत. पक्षात संघटना आणि लोकप्रतिनिधी या दोघांचेही महत्व आहे. त्यामुळे कोणीही लोकप्रतिनिधींना डावलणार नाही.’’

बारामतीत महायुतीच विजयी होणार!

बारामती लोकसभेची जागा कोणास, कोण उमेदवार असेल? याप्रश्नावर बावनकुळे म्हणाले, ‘‘बारामतीतून महायुतीच विजयी होणार, महायुतीचाच उमेदवार असेल."

टॅग्स :ElectionनिवडणूकChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे