शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

भाटकरांच्या आठवणींनी हळवा झाला स्वर अन् उलगडला मैत्रीचा पदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 01:14 IST

प्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर यांचे कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. रंगभूमीवर प्रसिद्ध होण्यापूर्वी भाटकर हे पिंपरीत टाटा मोटर्स कंपनीत नोकरी करीत होते.

पिंपरी : प्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर यांचे कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. रंगभूमीवर प्रसिद्ध होण्यापूर्वी भाटकर हे पिंपरीत टाटा मोटर्स कंपनीत नोकरी करीत होते. नोकरी करीत त्यांनी अभिनयाची आवड जोपासली आणि त्यातून एक सकस अभिनेता घडला. भाटकरांच्या अकाली जाण्याने टाटा मोटर्समधील सहकाऱ्यांचा स्वर काहीसा हळवा झाला होता.पिंपरी-चिंचवड शहरातील टाटा मोटर्स कंपनी म्हणजे शाऩ त्यामधून मोठे झालेले मान्यवर आज कला, राजकारण, समाजकारण अशा अनेक क्षेत्रांत नावलौकिक कमवित आहेत. त्यापैकी एक म्हणजेच रमेश भाटकर होत. त्यांच्या हृद्य आठवणी त्यांचे सहकारी मित्र बाबा राणे यांनी सांगितल्या. मित्राची आठवण सांगताना त्यांना सद्गदीत झाले होते.बाबा राणे हेही कलावंत. नोकरी सांभाळून त्यांनी कलेची आवड जोपासली होती. राणे म्हणाले, ‘‘टाटा मोटर्स कंपनीत असताना बॅच नंबर ५ मध्ये प्रशिक्षणार्थी कामगार म्हणून रमेश भाटकर रूजू झाले. १९७९ ते वर्ष होते. १९८० ते ८५ या कालखंडात भाटकर यांनी नोकरी केली. कंपनीतील पहिल्या दिवसापासूनच आमची ओळख झाली. म्हणतात ना मैत्रीला ओळख लागत नाही. ओळख मैत्रीत बदलली. आणि तो माझा खूप चांगला मित्र झाला. रमेश हा अत्यंत उत्साही होता. व्हर्सटाईल अ‍ॅक्टर होता. कलेबाबत त्याचे समर्पण होते. नाटक त्याचा आणि माझा श्वास. आम्ही विविध नाटकांत एकत्रितपणे काम करू लागलो. ग्रँड मास्टर, एकात्मका एकांकिका आणि अनेक नाटकात एकत्र काम केले. त्या वेळी ते पुण्यात राजेंद्रनगर येथे राहायचे. त्यानंतर कोथरूडला राहायला गेले. काम करून आम्ही नाटकाचे प्रयोग करायचो. आवड जोपासायचो. पुढे नाटक क्षेत्रात व्यावसायिक नाटके वाढायला लागली. कंपनीचे काम आणि नाटक असा काही मेळ बसेना. म्हणून १९८५ मध्ये त्याने कंपनी सोडली. त्यानंतर आमचा संवाद तुटला होता. मध्यंतरी त्यास पुरस्कार मिळाला आणि आजाराबद्दल समजले त्या वेळी मी भेटायला गेलो. त्या वेळी नाटकांचा तो सुवर्णकाळ समोर आला. आम्ही केलेल्या नाटकांचे त्यांनी काही डायलॉग बोलून दाखविले. त्याची स्वत:ची एक अनोखी शैली आहे. पाठांतरही उत्तम. उत्तम कलावंत आणि उत्तम माणूस म्हणूनही त्याची ओळख होती. चित्रपटातील नायक अचानकपणे सोडून गेल्याने पोकळी निर्माण झाली आहे.’’

टॅग्स :Ramesh Bhatkarरमेश भाटकरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड