शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

भाटकरांच्या आठवणींनी हळवा झाला स्वर अन् उलगडला मैत्रीचा पदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 01:14 IST

प्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर यांचे कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. रंगभूमीवर प्रसिद्ध होण्यापूर्वी भाटकर हे पिंपरीत टाटा मोटर्स कंपनीत नोकरी करीत होते.

पिंपरी : प्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर यांचे कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. रंगभूमीवर प्रसिद्ध होण्यापूर्वी भाटकर हे पिंपरीत टाटा मोटर्स कंपनीत नोकरी करीत होते. नोकरी करीत त्यांनी अभिनयाची आवड जोपासली आणि त्यातून एक सकस अभिनेता घडला. भाटकरांच्या अकाली जाण्याने टाटा मोटर्समधील सहकाऱ्यांचा स्वर काहीसा हळवा झाला होता.पिंपरी-चिंचवड शहरातील टाटा मोटर्स कंपनी म्हणजे शाऩ त्यामधून मोठे झालेले मान्यवर आज कला, राजकारण, समाजकारण अशा अनेक क्षेत्रांत नावलौकिक कमवित आहेत. त्यापैकी एक म्हणजेच रमेश भाटकर होत. त्यांच्या हृद्य आठवणी त्यांचे सहकारी मित्र बाबा राणे यांनी सांगितल्या. मित्राची आठवण सांगताना त्यांना सद्गदीत झाले होते.बाबा राणे हेही कलावंत. नोकरी सांभाळून त्यांनी कलेची आवड जोपासली होती. राणे म्हणाले, ‘‘टाटा मोटर्स कंपनीत असताना बॅच नंबर ५ मध्ये प्रशिक्षणार्थी कामगार म्हणून रमेश भाटकर रूजू झाले. १९७९ ते वर्ष होते. १९८० ते ८५ या कालखंडात भाटकर यांनी नोकरी केली. कंपनीतील पहिल्या दिवसापासूनच आमची ओळख झाली. म्हणतात ना मैत्रीला ओळख लागत नाही. ओळख मैत्रीत बदलली. आणि तो माझा खूप चांगला मित्र झाला. रमेश हा अत्यंत उत्साही होता. व्हर्सटाईल अ‍ॅक्टर होता. कलेबाबत त्याचे समर्पण होते. नाटक त्याचा आणि माझा श्वास. आम्ही विविध नाटकांत एकत्रितपणे काम करू लागलो. ग्रँड मास्टर, एकात्मका एकांकिका आणि अनेक नाटकात एकत्र काम केले. त्या वेळी ते पुण्यात राजेंद्रनगर येथे राहायचे. त्यानंतर कोथरूडला राहायला गेले. काम करून आम्ही नाटकाचे प्रयोग करायचो. आवड जोपासायचो. पुढे नाटक क्षेत्रात व्यावसायिक नाटके वाढायला लागली. कंपनीचे काम आणि नाटक असा काही मेळ बसेना. म्हणून १९८५ मध्ये त्याने कंपनी सोडली. त्यानंतर आमचा संवाद तुटला होता. मध्यंतरी त्यास पुरस्कार मिळाला आणि आजाराबद्दल समजले त्या वेळी मी भेटायला गेलो. त्या वेळी नाटकांचा तो सुवर्णकाळ समोर आला. आम्ही केलेल्या नाटकांचे त्यांनी काही डायलॉग बोलून दाखविले. त्याची स्वत:ची एक अनोखी शैली आहे. पाठांतरही उत्तम. उत्तम कलावंत आणि उत्तम माणूस म्हणूनही त्याची ओळख होती. चित्रपटातील नायक अचानकपणे सोडून गेल्याने पोकळी निर्माण झाली आहे.’’

टॅग्स :Ramesh Bhatkarरमेश भाटकरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड