शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

भाटकरांच्या आठवणींनी हळवा झाला स्वर अन् उलगडला मैत्रीचा पदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 01:14 IST

प्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर यांचे कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. रंगभूमीवर प्रसिद्ध होण्यापूर्वी भाटकर हे पिंपरीत टाटा मोटर्स कंपनीत नोकरी करीत होते.

पिंपरी : प्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर यांचे कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. रंगभूमीवर प्रसिद्ध होण्यापूर्वी भाटकर हे पिंपरीत टाटा मोटर्स कंपनीत नोकरी करीत होते. नोकरी करीत त्यांनी अभिनयाची आवड जोपासली आणि त्यातून एक सकस अभिनेता घडला. भाटकरांच्या अकाली जाण्याने टाटा मोटर्समधील सहकाऱ्यांचा स्वर काहीसा हळवा झाला होता.पिंपरी-चिंचवड शहरातील टाटा मोटर्स कंपनी म्हणजे शाऩ त्यामधून मोठे झालेले मान्यवर आज कला, राजकारण, समाजकारण अशा अनेक क्षेत्रांत नावलौकिक कमवित आहेत. त्यापैकी एक म्हणजेच रमेश भाटकर होत. त्यांच्या हृद्य आठवणी त्यांचे सहकारी मित्र बाबा राणे यांनी सांगितल्या. मित्राची आठवण सांगताना त्यांना सद्गदीत झाले होते.बाबा राणे हेही कलावंत. नोकरी सांभाळून त्यांनी कलेची आवड जोपासली होती. राणे म्हणाले, ‘‘टाटा मोटर्स कंपनीत असताना बॅच नंबर ५ मध्ये प्रशिक्षणार्थी कामगार म्हणून रमेश भाटकर रूजू झाले. १९७९ ते वर्ष होते. १९८० ते ८५ या कालखंडात भाटकर यांनी नोकरी केली. कंपनीतील पहिल्या दिवसापासूनच आमची ओळख झाली. म्हणतात ना मैत्रीला ओळख लागत नाही. ओळख मैत्रीत बदलली. आणि तो माझा खूप चांगला मित्र झाला. रमेश हा अत्यंत उत्साही होता. व्हर्सटाईल अ‍ॅक्टर होता. कलेबाबत त्याचे समर्पण होते. नाटक त्याचा आणि माझा श्वास. आम्ही विविध नाटकांत एकत्रितपणे काम करू लागलो. ग्रँड मास्टर, एकात्मका एकांकिका आणि अनेक नाटकात एकत्र काम केले. त्या वेळी ते पुण्यात राजेंद्रनगर येथे राहायचे. त्यानंतर कोथरूडला राहायला गेले. काम करून आम्ही नाटकाचे प्रयोग करायचो. आवड जोपासायचो. पुढे नाटक क्षेत्रात व्यावसायिक नाटके वाढायला लागली. कंपनीचे काम आणि नाटक असा काही मेळ बसेना. म्हणून १९८५ मध्ये त्याने कंपनी सोडली. त्यानंतर आमचा संवाद तुटला होता. मध्यंतरी त्यास पुरस्कार मिळाला आणि आजाराबद्दल समजले त्या वेळी मी भेटायला गेलो. त्या वेळी नाटकांचा तो सुवर्णकाळ समोर आला. आम्ही केलेल्या नाटकांचे त्यांनी काही डायलॉग बोलून दाखविले. त्याची स्वत:ची एक अनोखी शैली आहे. पाठांतरही उत्तम. उत्तम कलावंत आणि उत्तम माणूस म्हणूनही त्याची ओळख होती. चित्रपटातील नायक अचानकपणे सोडून गेल्याने पोकळी निर्माण झाली आहे.’’

टॅग्स :Ramesh Bhatkarरमेश भाटकरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड