शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

किरकोळ कारणावरून दोन कुटुंबात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 20:02 IST

परस्पर विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून किरकोळ कारणावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. एका कुटुंबाने बांधकामावर मारलेले पाणी आपल्या घरासमोर पडले म्हणून तर दुसऱ्या कुटुंबाने घराला चिटकून भिंत बांधल्याच्या कारणावरून भांडण काढले असल्याचे परस्पर विरोधात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना मंगळवारी (दि. १२) सकाळी पावणेबाराच्या सुमारास दापोडी येथे घडली. लक्ष्मण आप्पाराव कांबळे (वय ५०, रा. रौंधळे चाळ, दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमर रामदास उदमले (वय ३४), रामदास बन्सी उदमले (वय ५८, दोघे रा. रौंधळे चाळ, दापोडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी उदमले आणि फिर्यादी लक्ष्मण यांच्यामध्ये जमिनीच्या कारणावरून मागील काही दिवसांपासून वाद सुरू होते. मंगळवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास लक्ष्मण त्यांच्या बांधकामावर पाणी मारत होते. ते पाणी उदमले यांच्या घरासमोर पडले. या कारणावरून उदमले पितापुत्रांनी मिळून लक्ष्मण यांना शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये त्यांच्या डोक्यास व पायास गंभीर दुखापत झाली आहे.

याच्या परस्परविरोधात रामदास बन्सी उदमले (वय ५८) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बाळू उर्फ लक्ष्मण कांबळे, हृषीकेश लक्ष्मण कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रामदास यांच्या घराच्या बाजूला चिटकून भिंत बांधण्याच्या कारणावरून आरोपींनी भांडण काढले. रामदास यांना शिवीगाळ करत विटा फेकून मारल्या. यामध्ये रामदास जखमी झाले. तसेच त्यांच्या घरातील साहित्याचे नुकसान झाले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस