शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

किरकोळ कारणावरून दोन कुटुंबात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 20:02 IST

परस्पर विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून किरकोळ कारणावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. एका कुटुंबाने बांधकामावर मारलेले पाणी आपल्या घरासमोर पडले म्हणून तर दुसऱ्या कुटुंबाने घराला चिटकून भिंत बांधल्याच्या कारणावरून भांडण काढले असल्याचे परस्पर विरोधात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना मंगळवारी (दि. १२) सकाळी पावणेबाराच्या सुमारास दापोडी येथे घडली. लक्ष्मण आप्पाराव कांबळे (वय ५०, रा. रौंधळे चाळ, दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमर रामदास उदमले (वय ३४), रामदास बन्सी उदमले (वय ५८, दोघे रा. रौंधळे चाळ, दापोडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी उदमले आणि फिर्यादी लक्ष्मण यांच्यामध्ये जमिनीच्या कारणावरून मागील काही दिवसांपासून वाद सुरू होते. मंगळवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास लक्ष्मण त्यांच्या बांधकामावर पाणी मारत होते. ते पाणी उदमले यांच्या घरासमोर पडले. या कारणावरून उदमले पितापुत्रांनी मिळून लक्ष्मण यांना शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये त्यांच्या डोक्यास व पायास गंभीर दुखापत झाली आहे.

याच्या परस्परविरोधात रामदास बन्सी उदमले (वय ५८) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बाळू उर्फ लक्ष्मण कांबळे, हृषीकेश लक्ष्मण कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रामदास यांच्या घराच्या बाजूला चिटकून भिंत बांधण्याच्या कारणावरून आरोपींनी भांडण काढले. रामदास यांना शिवीगाळ करत विटा फेकून मारल्या. यामध्ये रामदास जखमी झाले. तसेच त्यांच्या घरातील साहित्याचे नुकसान झाले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस