शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

कार्तिकी यात्रा काळात भाविकांची गैरसोय टाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 01:30 IST

अधिकाऱ्यांच्या सूचना : माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आढावा बैठक

आळंदी : येथील आळंदी कार्तिकी यात्रेत भाविकांना सेवा सुविधा देण्यासाठी आणि भाविकांची यात्रा काळात गैरसोय होणार नाही, यासाठी दक्षता घेण्यास सुचना तसेच यात्रा सुलभ व सुखकर होण्यासाठी विविध शासकीय खात्यातील विभाग प्रमुख, अधिका-यांनी सुरक्षित, आरोग्यदायी सोहळा होण्यास केलेले यात्रा नियोजन जाहीर केले. तसेच या वेळी सूचना या बैठकीत करण्यात आल्या. बैठकीच्या पीठासीन अधिकारी म्हणून खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले होत्या.

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिन सोहळा आळंदी कार्तिकी यात्रा अंतर्गत ३० नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०१८ या कालावधीत होत आहे. या यात्रेस राज्य परिसरातून लाखो भाविक देवदर्शनास येत असतात. तीर्थक्षेत्र आळंदीत आलेल्या भाविकांसह नागरिकांना विविध सेवा सुविधा देण्यासाठी तसेच यात्रा काळात भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आळंदी नगरपरिषद सभागृहात सोहळ्याच्या तयारी साठी नियोजन पूर्व आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यावेळी खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांनी विविध शासकीय खात्यांचे अधिकारी-पदाधिकारी, कर्मचारी, विविध संस्थांचे मान्यवर पदाधिकारी यांचेशी सुसंवाद साधून आढावा घेत प्रशासनाला विविध सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी सूचना देण्यात आल्या. या बैठकीस आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधरी, नगरपरिषद नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, सरपंच अश्विनी सस्ते, मुख्याधिकारी समीर भूमकर, उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, आळंदी देवस्थानचे विश्वस्त अजित कुलकर्णी, नगरसेविका सुनीता रंधवे, प्रकाश कुºहाडे, सागर भोसले, संतोष गावडे, पुषा कुºहाडे, मालक उपस्थित होते. आळंदीत यात्रेच्या काळात भाविक, नागरिक यांना सेवा सुविधा देताना आरोग्य व सुरक्षितता कायम राहील याची काळजी घेण्यास प्राधान्य देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. ३० नोव्हेंबर पासून आळंदी कार्तिकी यात्रा सुरु होत आहे.त्यापूर्वी भाविक नागरिक यांना विविध नागरी सेवा सुविधा देण्यासाठी प्राधान्य देण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले. यावेळी शासकीय अधिकारी, विभाग प्रमुख यांनी बैठकीत सादर केलेल्या नियोजन प्रमाणे कामकाज करण्याचे सूचना देत नियोजना प्रमाणे कामकाज करण्यास दक्षता घेण्याचे आवाहन केले, भाविकांची दर्शनबारीची व्यवस्था आळंदी देवस्थान, नगरपरिषद व जागा मालक यांच्यात संवाद साधून पर्यायी व्यवस्था करण्यास मार्ग काढला जाईल. पुढील वर्षी दर्शनबारीचा विषय रहाणार नाही. भाविकांसाठी दर्शनबारीचा प्रश्न मार्गी लावू. यात्रा काळातगैरसोय होऊ देणार नाही अशी ग्वाही वैजयंता उमरगेकर यांनी दिली.आळंदीतील यात्रा नियोजनात सुसंवाद वाढविणार : भूमकरआळंदी नगरपरिषदेच्या वतीने भाविकांसाठी यात्रा काळात विविध विभाग निहाय नियोजन करण्यात आले आहे. कामगार, पदाधिकारी, अधिकारी सर्व शासकीय खात्यांचे प्रमुख यांचे मधील सुसंवादातून भाविकांना प्रभावी सेवा सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली.यात्रा काळात तात्पूत्या स्वरूपात नगरपरिषदेच्या वतीने सारा प्लास्टचे तसेच आळंदी देवस्थानचे वतीने १०० स्वच्छता गृहांची सोय करण्यात येत आहे.तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील ३८२ स्वच्छता गृहे वापरण्यास उपलब्ध करण्यात आली आहे.परिषदेसह अतिरिक्त जादा कामगार ३ सत्रात यात्रा काळात कार्यरत राहणार आहेत. स्वच्छतेचे कामकाज दिवस रात्र करण्यात येणार असल्याने शहरात यात्रा काळात कचरा साठून राहणार नाही.१० धुरळणी यंत्रांचे माध्यमातून धुरीकरण करण्यात येणार आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसPandharpurपंढरपूर