शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

प्राधिकरणातील दीड लाख बांधकामे होणार नियमित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 01:49 IST

अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचा निर्णय राज्य शासनाने घेतला असला, तरी पिंपरी-चिंचवड शहरातील नवनगर विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे नियमित झाली नव्हती.

पिंपरी : अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचा निर्णय राज्य शासनाने घेतला असला, तरी पिंपरी-चिंचवड शहरातील नवनगर विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे नियमित झाली नव्हती. प्राधिकरण क्षेत्रातील बांधकामे नियमित करावीत, असा शासनादेश सरकारने काढल्याने सुमारे दीड लाख बांधकामे नियमित होणार आहेत. प्राधिकरणवासीयांना दिलासा मिळाला आहे.शहरातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न राज्यभर गाजला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांधकामे नियमितीकरणाचे धोरण स्वीकारले. मात्र, महापालिका क्षेत्रातील बांधकामे नियमित करण्यास मंजुरी देण्यात आली होती. शासनाच्या आरक्षित जागांवरील बांधकामांबाबत निर्णय झाला नव्हता. पिंपरी-चिंचवड शहरात प्राधिकरणाने संपादित न केलेल्या जागांवर मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली होती. नागरिकांनी गुठा, दोन गुंठे जागा घेऊन बांधकामे केली होती. गेल्या वर्षी अनधिकृत बांधकामांच्या नियमितीकरणाचा निर्णय होऊनही प्राधिकरणातील बांधकामांना दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत या भागातील बांधकामे नियमित करावीत, अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली होती. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासकीय जमिनीवरील बांधकामे नियमित करण्याचे धोरण सरकारने स्वीकारले असून, त्याचा अध्यादेश काढला.>समाविष्ट दहा गावांना होणार लाभपिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे दहा गावांचे क्षेत्र आहे. काळेवाडी, थेरगाव, चिंचवड, वाल्हेकरवाडी, रावेत, इंद्रायणीनगर, चिखली, मोशी, भोसरी हा परिसर प्राधिकरणात येतो. या भागातील मूळ शेतकऱ्यांकडून नागरिकांनी गुंठे, दोन गुंठे जागा घेऊन घरकुले उभारली होती. ती बांधकामे नियमित करावीत, अशी मागणी सन २००९ पासून होती. मात्र, राष्टÑवादी आणि काँग्रेस सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने हा प्रश्न भिजत पडला होता. भाजपाची सत्ता आल्यानंतर राज्य सरकारने नियमितीकरणाचे धोरण स्वीकारले. त्या वेळी प्राधिकरणाने जी नियमावली तयार केली, त्यात आजच्या रेडीरकनरच्या दराने दंड भरावा लागणार होता. त्यामुळे नियमितीकरण प्राधिकरण विभागात शक्य नव्हते. दहा गावांच्या परिसरात सुमारे दीड लाखाहून अधिक बांधकामे आहेत.>टांगती तलवार दूरप्राधिकरणवासीयांवर टांगती तलवार कायम होती. राज्य शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेच्या धर्तीवर नव्यानिर्णयाने प्राधिकरणवासीयांना दिलासा मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड शहर तसेच शहरालगतच्या महापालिकेत समाविष्ट गावांतील मिळकतधारकांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.