शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

आकुर्डी प्राधिकरण : बैठकांनंतरही पाणीप्रश्न कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 05:59 IST

पदाधिका-यांच्या बैठका तर कधी पाणीपुरवठा अधिका-यांसमवेत बैठका घेतल्या जात आहेत. बैठकांवर बैठका घेतल्या तरी आकुर्डी, प्राधिकरणातील पाणी प्रश्नाचे भिजत घोंगडे मात्र कायम आहे. पाणीउपसा केंद्र तसेच जलशुद्धीकरण केंद्र या परिसरात आहे. तेथील रहिवाशांना मात्र पिण्यास पुरेसे पाणी मिळत नाही. याबद्दल नागरिक संतप्त प्रतिक्रिया नोंदवू लागले आहेत.

पिंपरी : पदाधिका-यांच्या बैठका तर कधी पाणीपुरवठा अधिका-यांसमवेत बैठका घेतल्या जात आहेत. बैठकांवर बैठका घेतल्या तरी आकुर्डी, प्राधिकरणातील पाणी प्रश्नाचे भिजत घोंगडे मात्र कायम आहे. पाणीउपसा केंद्र तसेच जलशुद्धीकरण केंद्र या परिसरात आहे. तेथील रहिवाशांना मात्र पिण्यास पुरेसे पाणी मिळत नाही. याबद्दल नागरिक संतप्त प्रतिक्रिया नोंदवू लागले आहेत.उपमहापौर शैलजा मोरे यांनी नुकतीच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी प्रवीण लडकत, रवींद्र दुधेकर यांच्यासह अन्य अधिकाºयांची बैठक घेऊन पाणीपुरवठ्याचा प्रश्न कसा सुटू शकेल याविषयी अधिकाºयांचे मत जाणून घेतले. पेठ क्रमांक २३ मध्ये पाण्याची उंच टाकी बांधण्याचे नियोजन आहे. टाकीचे हे काम पूर्ण होताच, प्राधिकरण, गंगानगर आणि आकुर्डी परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटेल, असे अधिका-यांनी सांगितले.टाकीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी समस्या सुटेल हे कोणीही सांगू शकेल. परंतु सद्य:स्थितीत उपलब्ध पाण्याचे नियोजन कसे करता येईल. याबाबत पाणीपुरवठा अधिकाºयांकडून तोडगा सांगितला जात नाही. पाण्याची टाकी बांधण्याच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.निविदा मंजूर होणार, त्यानंतर काही दिवसांनी प्रत्यक्षात टाकी बांधण्याचे काम सुरू होईल, हे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न सुटेल, असा अंदाज व्यक्त होत आहे, अर्थातच पाण्याची टाकी उभारण्यापर्यंत दीड ते दोन वर्षांचा कालावधी जाणार आहे. एवढी प्रतीक्षा कोण करणार? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत.हिवाळ्यात समस्या : उन्हाळ्यात काय होईल ?बैठका बस्स झाल्या, पदाधिकारी, अधिका-यांनी आता कृतिशील पाऊल उचलावे, ऐन हिवाळ्यात पाणी समस्या भेडसावते. उन्हाळ्यात नागरिकांचे काय हाल होतील? याचा विचार करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात. या भागाचा पाणीपुरवठा सुरुळीत करावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणी