शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

आकुर्डी प्राधिकरण : बैठकांनंतरही पाणीप्रश्न कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 05:59 IST

पदाधिका-यांच्या बैठका तर कधी पाणीपुरवठा अधिका-यांसमवेत बैठका घेतल्या जात आहेत. बैठकांवर बैठका घेतल्या तरी आकुर्डी, प्राधिकरणातील पाणी प्रश्नाचे भिजत घोंगडे मात्र कायम आहे. पाणीउपसा केंद्र तसेच जलशुद्धीकरण केंद्र या परिसरात आहे. तेथील रहिवाशांना मात्र पिण्यास पुरेसे पाणी मिळत नाही. याबद्दल नागरिक संतप्त प्रतिक्रिया नोंदवू लागले आहेत.

पिंपरी : पदाधिका-यांच्या बैठका तर कधी पाणीपुरवठा अधिका-यांसमवेत बैठका घेतल्या जात आहेत. बैठकांवर बैठका घेतल्या तरी आकुर्डी, प्राधिकरणातील पाणी प्रश्नाचे भिजत घोंगडे मात्र कायम आहे. पाणीउपसा केंद्र तसेच जलशुद्धीकरण केंद्र या परिसरात आहे. तेथील रहिवाशांना मात्र पिण्यास पुरेसे पाणी मिळत नाही. याबद्दल नागरिक संतप्त प्रतिक्रिया नोंदवू लागले आहेत.उपमहापौर शैलजा मोरे यांनी नुकतीच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी प्रवीण लडकत, रवींद्र दुधेकर यांच्यासह अन्य अधिकाºयांची बैठक घेऊन पाणीपुरवठ्याचा प्रश्न कसा सुटू शकेल याविषयी अधिकाºयांचे मत जाणून घेतले. पेठ क्रमांक २३ मध्ये पाण्याची उंच टाकी बांधण्याचे नियोजन आहे. टाकीचे हे काम पूर्ण होताच, प्राधिकरण, गंगानगर आणि आकुर्डी परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटेल, असे अधिका-यांनी सांगितले.टाकीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी समस्या सुटेल हे कोणीही सांगू शकेल. परंतु सद्य:स्थितीत उपलब्ध पाण्याचे नियोजन कसे करता येईल. याबाबत पाणीपुरवठा अधिकाºयांकडून तोडगा सांगितला जात नाही. पाण्याची टाकी बांधण्याच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.निविदा मंजूर होणार, त्यानंतर काही दिवसांनी प्रत्यक्षात टाकी बांधण्याचे काम सुरू होईल, हे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न सुटेल, असा अंदाज व्यक्त होत आहे, अर्थातच पाण्याची टाकी उभारण्यापर्यंत दीड ते दोन वर्षांचा कालावधी जाणार आहे. एवढी प्रतीक्षा कोण करणार? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत.हिवाळ्यात समस्या : उन्हाळ्यात काय होईल ?बैठका बस्स झाल्या, पदाधिकारी, अधिका-यांनी आता कृतिशील पाऊल उचलावे, ऐन हिवाळ्यात पाणी समस्या भेडसावते. उन्हाळ्यात नागरिकांचे काय हाल होतील? याचा विचार करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात. या भागाचा पाणीपुरवठा सुरुळीत करावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणी