शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

राज्यात एकच मंत्री, उपमुख्यमंत्री बिनखात्याचेच; अजित पवारांची राज्य सरकारवर बोचरी टीका

By नारायण बडगुजर | Updated: August 6, 2022 19:53 IST

युती, आघाडीचा निर्णय राजकीय परिस्थितीनुसार....

पिंपरी : गेल्या एक महिन्यापासून राज्यामध्ये अवघ्या एका व्यक्तीचं मंत्रीमंडळ आहे. मुख्यमंत्री एकटे आणि त्यांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस आहेत. असे असले तरी त्यांना खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे फडणवीस बिनखात्याचे उपमुख्यमंत्री आहेत, असा टोला लगावत विधानसभेचे विरोधी पथनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. 

पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे ‘निर्धार महाविजयाचा संवाद कार्यकर्त्यांचा’ ही संवाद सभा चिंचवड येथे झाली. त्यावेळी अजित पवार बोलत होते. पवार म्हणाले, निवडणुका घेण्याबाबत न्यायालयाने सांगितले आहे. तरीही राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ दिल्या जात नाहीत. महापालिकेची प्रभागरचना, जिल्हा परिषदेची गट रचना बदलून सदस्य संख्या कमी केली. तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होता पण, बाकीच्यांना मात्र प्रतिनिधित्व द्यायचे नाही, असे सुरू आहे. यातून लोकशाहीचा खून केला, मुडदा पाडला. लोकांच्यातून नगराध्यक्ष निवडून आणला जाणार आहे. मग तसा महापौर, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान देखील थेट लोकांमधून निवडून आणा. इतरांसाठी एक न्याय आणि तुमच्यासाठी दुसरा न्याय, हे कसे चालेल? लोक आता गप्प आहेत. मात्र, संधी मिळाल्यावर कुठलं बटण दाबतील हे कळणार नाही. मनामध्ये आल्यास जनता कुणालाही उलथवून टाकू शकते. 

मुख्यमंत्र्यांचे अधिकार चिफ सेक्रेटरीला द्यामंत्रीमंडळ विस्तार न झाल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले. मग राज्याचे अधिकारही चिफ सेक्रेटरीला द्यावेत आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी घरी बसावे. मंत्रीमंडळ लवकरच होणार, असे सांगितले जाते. मात्र, ते कधी येणार हे सांगत नाहीत. त्यात काय अडचणी आहेत ते सांगितले पाहिजे. दिल्लीतून सिग्नल मिळत नसेल तर तेही सांगावे. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांना मंत्री, राज्यमंत्री तसेच महामंडळाच्या अध्यक्ष पदाचे  असे म्हणत अजित पवार यांनी टिका केली.  

युती, आघाडीचा निर्णय राजकीय परिस्थितीनुसारराज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कोणत्या पक्षासोबत युती किंवा आघाडी करायची याबाबत त्यावेळच्या राजकीय परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल. शक्यतोवर पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले. 

त्यांना सद्बुध्दी मिळो...मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या दिल्लीच्या फेऱ्या वाढल्या आहेत. सर्वांच्याच नजरा त्यांच्याकडे लागल्या आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना सद्बुध्दी मिळून मंत्रीमंडळ विस्तार होईल, अशी अपेक्षा असल्याचे पवार म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस