शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात एकच मंत्री, उपमुख्यमंत्री बिनखात्याचेच; अजित पवारांची राज्य सरकारवर बोचरी टीका

By नारायण बडगुजर | Updated: August 6, 2022 19:53 IST

युती, आघाडीचा निर्णय राजकीय परिस्थितीनुसार....

पिंपरी : गेल्या एक महिन्यापासून राज्यामध्ये अवघ्या एका व्यक्तीचं मंत्रीमंडळ आहे. मुख्यमंत्री एकटे आणि त्यांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस आहेत. असे असले तरी त्यांना खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे फडणवीस बिनखात्याचे उपमुख्यमंत्री आहेत, असा टोला लगावत विधानसभेचे विरोधी पथनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. 

पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे ‘निर्धार महाविजयाचा संवाद कार्यकर्त्यांचा’ ही संवाद सभा चिंचवड येथे झाली. त्यावेळी अजित पवार बोलत होते. पवार म्हणाले, निवडणुका घेण्याबाबत न्यायालयाने सांगितले आहे. तरीही राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ दिल्या जात नाहीत. महापालिकेची प्रभागरचना, जिल्हा परिषदेची गट रचना बदलून सदस्य संख्या कमी केली. तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होता पण, बाकीच्यांना मात्र प्रतिनिधित्व द्यायचे नाही, असे सुरू आहे. यातून लोकशाहीचा खून केला, मुडदा पाडला. लोकांच्यातून नगराध्यक्ष निवडून आणला जाणार आहे. मग तसा महापौर, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान देखील थेट लोकांमधून निवडून आणा. इतरांसाठी एक न्याय आणि तुमच्यासाठी दुसरा न्याय, हे कसे चालेल? लोक आता गप्प आहेत. मात्र, संधी मिळाल्यावर कुठलं बटण दाबतील हे कळणार नाही. मनामध्ये आल्यास जनता कुणालाही उलथवून टाकू शकते. 

मुख्यमंत्र्यांचे अधिकार चिफ सेक्रेटरीला द्यामंत्रीमंडळ विस्तार न झाल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले. मग राज्याचे अधिकारही चिफ सेक्रेटरीला द्यावेत आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी घरी बसावे. मंत्रीमंडळ लवकरच होणार, असे सांगितले जाते. मात्र, ते कधी येणार हे सांगत नाहीत. त्यात काय अडचणी आहेत ते सांगितले पाहिजे. दिल्लीतून सिग्नल मिळत नसेल तर तेही सांगावे. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांना मंत्री, राज्यमंत्री तसेच महामंडळाच्या अध्यक्ष पदाचे  असे म्हणत अजित पवार यांनी टिका केली.  

युती, आघाडीचा निर्णय राजकीय परिस्थितीनुसारराज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कोणत्या पक्षासोबत युती किंवा आघाडी करायची याबाबत त्यावेळच्या राजकीय परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल. शक्यतोवर पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले. 

त्यांना सद्बुध्दी मिळो...मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या दिल्लीच्या फेऱ्या वाढल्या आहेत. सर्वांच्याच नजरा त्यांच्याकडे लागल्या आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना सद्बुध्दी मिळून मंत्रीमंडळ विस्तार होईल, अशी अपेक्षा असल्याचे पवार म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस