शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

रिक्षाचालक मालकांचा राज्य सरकार विरोधात संताप; पिंपरीत केले बोंबाबोंब आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 12:04 IST

राज्य शासनाने रिक्षाचालकांचे प्रश्न न सोडवल्यामुळे त्याांच्यावर उपासमारीची वेळ आली आहेे. 

पिंपरी : रिक्षा चालकाच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन झाले. रिक्षाचालक मालकांनी केले बोंबाबोंब आंदोलन केले.     

राज्य शासनाने रिक्षाचालकांचे प्रश्न न सोडवल्यामुळे त्याांच्यावर उपासमारीची वेळ आली आहेे. एसटी बसला तसेच मुंबईमध्ये बेस्ट आधी पुण्यात पीएमसी वाहतुकीस परवानगी दिली.परंतु रिक्षा व्यवसायात मात्र अनेक बंधने घातली आहेत.आज ७० टक्के रिक्षा बंद आहेत. गेली सहा महिन्यापासून बंद असलेल्या रिक्षा सेवा तात्काळ सुरू करावी. रिक्षाचालकांच्या इतरही मागण्या सोडवाव्यात.. तसेच राज्य सरकारने रिक्षाचालकांचे प्रश्न न सोडवल्यामुळे संताप व्यक्त केला आहे.

बाबा कांबळे म्हणाले, सरकारने एसटी बसला तसेच मुंबईमध्ये बेस्ट आधी पुण्यात पीएमसी वाहतुकीस परवानगी दिली.परंतु रिक्षा व्यवसायात मात्र अनेक बंद घालण्यात आली आहेत, आज ७० टक्के रिक्षा बंद आहेत. गेली सहा महिन्यापासून बंद असलेल्या रिक्षा सेवा तात्काळ सुरू करावी. रिक्षाचालकांच्या इतरही मागण्या सोडवाव्यात.'' 

बाळासाहेब भागवत यांनी सांगितले,  रिक्षाचालक हातावरचा पोट असणारा घटक असून त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. रिक्षावाल्यासोबत आम्ही ठामपणे उभे आहोत सरकारने त्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत.'' 

सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजय अवतारे यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले.

या आंदोलनात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र सचिव बाळासाहेब भागवत, सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई सावळे, कुणाल वावळकर यांनी पाठिंबा दिला. यावेळी बाळासाहेब सोनवणे, इजाज शेख, बाळासाहेब ढवळे, वकील शेख, दत्तू सरकते, आदी सहभागी झाले होते..........

अशा आहेत मागण्या १) रिक्षा चालकांना आर्थिक मदत म्हणून प्रत्येक महिना दहा हजार मिळावे २)शेतकऱ्यांच्या धर्तीवर रिक्षा चालकांचे कर्ज माफ करावे त्यांची आर सी बुक कोरे करावे ३) मुक्त रिक्षा परवाना बंद करावा, ओला उबेर वर निर्बंध आणावेत ४) रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे ५) फायनान्स कंपनी आणि बँकेच्या वतीने हप्ते वसुली साठी रिक्षा चालकांना त्रास दिला जात आहे, याबाबत सक्त वसुली आणि गुंडागर्दी दादागिरी करू नये असे आदेश सरकारने संबंधित सर्व फायनान्स आणि बँकांना द्यावेत ६) रिक्षा चालक मालकांसाठी घरकुल योजना राबवावी.७)रिक्षा चालक मालकांसाठी कोरोना च्या काळात ५० लाखाचा विमा मिळावा.

 ...........

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडauto rickshawऑटो रिक्षाagitationआंदोलनState Governmentराज्य सरकार