शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

केंद्र सरकारवर टीका करत पिंपरीत माकपतर्फे धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 19:36 IST

नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण

ठळक मुद्देदेशात घुसखोर आहेत ते शोधण्यासाठी विद्यमान कायदे पुरेसे

पिंपरी : नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. अमानुष दडपशाहीमुळे विद्यार्थी आणि युवाशक्ती देशभर संताप व्यक्त करीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात धरणे करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारवर टीका करण्यात आली. डॉ. सुरेश बेरी, गणेश दराडे, क्रांतिकुमार कडुलकर, सचिन देसाई, अपर्णा दराडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. स्वप्नील जेवळे, अविनाश लाटकर, ख्वाजा जमखाने, अनिरुद्ध चव्हाण, रंजना पवार, रंजिता लाटकर, नंदा शिंदे, शैलजा कडुलकर, शाजी, फिलिप, अनिलकुमार, पुनपन, संतोष गायकवाड आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. गणेश दराडे यावेळी म्हणाले, नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. अमानुष दडपशाहीमुळे विद्यार्थी आणि युवाशक्ती देशभर संताप व्यक्त करीत आहे. भारतीय संविधानातील सात मूलभूत अधिकारांचे उल्लंघन या कायद्यामुळे होत आहे. नोटबंदीमुळे सर्व देश रांगेत उभा होता. त्यामुळे देशवासीय परेशान झाले होते. आता नागरिकत्वासाठी पुन्हा रांगेत उभे राहावे लागेल काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.डॉ. सुरेश बेरी म्हणाले, देशात घुसखोर आहेत ते शोधण्यासाठी विद्यमान कायदे पुरेसे आहेत. एनआरसीमुळे सैन्यामधून निवृत्त झालेल्या लोकांना अभारतीय ठरवण्यात आले. आसाममध्ये अभारतीय लोकांना छळ छावणीत ठेवण्यात आले आहे. मुस्लिमद्वेषाचे राजकारण १९९२ पासून सुरू आहे. देशातील विचारवंत, युवापिढीच्या प्रतिक्रिया आणि अनेक विद्यापीठांमधील आंदोलने सरकारवरचा विश्वास उडाल्यामुळे होत आहेत.क्रांतिकुमार कडुलकर म्हणाले, नागरिकत्व सुधारणा कायदा त्वरित मागे घेणे आवश्यक आहे. त्यासाठी या कायद्याचे विधेयक संसदीय समितीकडे व्यापक चचेर्साठी पाठवावे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक