शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हा दाखल झाल्यानंतरही निगडीत अतिक्रमण जैसे थे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 01:15 IST

गुरुवारी सायंकाळी निगडीतील टिळक चौक येथील रस्ते व पदपथावरील अतिक्रमणांवर कारवाई सुरू होती.

- मंगेश पांडे पिंपरी : गुरुवारी सायंकाळी निगडीतील टिळक चौक येथील रस्ते व पदपथावरील अतिक्रमणांवर कारवाई सुरू होती. कारवाईला विरोध केल्याने अतिक्रमणधारक व अतिक्रमण विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हाही दाखल झाला. एवढा मोठा गोंधळ झाला असतानाही येथील अतिक्रमणे ‘जैसे थे’च आहेत. त्यामुळे या अतिक्रमणाला पाठबळ कुणाचे आहे, असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी ८ ते १० जणांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणानंतर तरी येथील अतिक्रमणे हटतील, अशी अपेक्षा होती. मात्र, गुरुवारी झालेल्या कारवाईनंतर लगेचच येथील अतिक्रमणे ‘जैसे थे’ असल्याचे पाहायला मिळत आहेत.अतिक्रमण रोखण्यासाठी व त्यांच्यावर कारवाईसाठी महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा आहे. यासाठी अतिक्रमणविरोधी पथक स्थापन केले असून, त्यांच्यामार्फत कारवाई केली जाते. पूर्वी प्रभाग कार्यालयनिहाय ही पथके स्थापन करून कारवाई केली जात होती. आता मात्र, महापालिका मुख्यालयातून शहरातील अतिक्रमण कारवाईचे कामकाज पाहिले जात आहे. ज्या भागात कारवाई असेल त्या ठिकाणी मुख्यालयात पथक पाठवितात. कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, किमान १५ मजूर, बुलडोझर, टेम्पो यासह कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतो. एका ठिकाणी कारवाईसाठी एवढी यंत्रणा वापरली जाते. मात्र, ज्या ठिकाणी कारवाई केली जाते, त्या ठिकाणी काही तासांतच पुन्हा अतिक्रमण थाटले जाते. अतिक्रमण कारवाईचा खरेच उपयोग होतो का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.>काही तासांतच पुन्हा थाटली दुकानेरहदारीस अडथळा ठरणाºया, तसेच महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमणावर महापालिकेकडून कारवाई केली जाते. यासाठी महापालिकेची मोठी यंत्रणा वापरली जाते. मात्र, कारवाईसाठी आलेले पथक कारवाई करून गेल्यानंतर पुन्हा काही तासांतच त्याच ठिकाणी अतिक्रमणे थाटलेली पाहायला मिळतात. त्यामुळे कारवाईचा देखावा कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.अतिक्रमणामुळे अपघाताचा धोकापदपथावरील अतिक्रमणामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे अपघाताचा धोका होऊ असतो. गुरुवारी कारवाईच्या वेळी वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे वाहनचालकांची दमछाक झाली. कारवाईसाठी काही काळ नागरिकांना वेठीस धरण्यात आले. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.दबावाने अधिकाºयाची कोंडीअतिक्रमण कारवाईसाठी पथक आल्यानंतर अथवा कधी कधी तर संबंधित ठिकाणी जाण्यापूर्वीच पथकातील अधिकाऱ्यांना राजकीय पदाधिकाºयांचे फोन येतात. ‘आपला कार्यकर्ता आहे, त्या ठिकाणी कारवाई करू नका’ असा आदेश सोडला जातो. त्यामुळे पथकातील अधिकाºयांचीही कोंडी होते.