शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

रिंगरोडबाधितांवर कारवाई? प्राधिकरण प्रशासनाकडून तयारी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 03:07 IST

रिंगरोड प्रकल्पासाठी जागा ताब्यात घेण्याची तयारी प्राधिकरण प्रशासनाने सुरू केली असून, येत्या दोन-तीन दिवसांत पोलीस बंदोबस्तात बधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

रावेत : रिंगरोड प्रकल्पासाठी जागा ताब्यात घेण्याची तयारी प्राधिकरण प्रशासनाने सुरू केली असून, येत्या दोन-तीन दिवसांत पोलीस बंदोबस्तात बधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.पिंपरी महापालिका आणि प्राधिकरणाच्या मंजूर विकास आराखड्यानुसार ३० मीटर रुंद एचसीएमटीआरचा ६५ टक्के जागेचा ताबा असून उर्वरित जागा ताब्यात घेण्याबाबत पालिका व प्राधिकरणामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. वाल्हेकरवाडी ते रहाटणीपर्यंतच्या प्राधिकरणाच्या नियोजन क्षेत्रातील एचसीएमटीआर रस्त्याच्या आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे हजारो नागरिक बेघर होणार आहेत. या कारवाईला विरोध करत रिंगरोडबाधित नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहेत. पर्यायी मार्गाने रिंगरोड वळविण्यासाठी घरबचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी नगरविकास विभागाचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांची भेट घेतली. जुलै महिन्याच्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या विरोधी पक्षांनी रिंगरोडवर सभागृहात चर्चा करण्याची मागणी ही केली होती.चिंचवडेनगर, बिजलीनगर येथील अनधिकृत बांधकामांवर कार्यवाहीची जोरदार तयारी प्रशासनाने केलीअसून, येत्या १३ आणि १४ तारखेला रिंगरोडबाधितांवर कारवाईहोण्याची शक्यता आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही़ कारवाईमुळे अनेकांना बेघर होण्याची भीती निर्माण झाली आहे.सत्ताधारी भाजपा सरकारने जनतेला दिलेला प्राधिकरणातील अनियमित घरे नियमित करण्याचा शब्द पाळला पाहिजे, खूप विश्वासाने यांना या जनतेने निवडून दिले आहे. परंतु हेही सरकार जाणीवपूर्वक रिंगरोड सह या प्रश्नाचे राजकारण करत आहे. हे आता जनतेच्या लक्षात आले आहे. सत्तेमधील काही लोकांचा या जागेवर डोळा असल्यानेच हा प्रश्न सोडविला जात नाही. एकीकडे घरे वाचवण्याची आश्वासने द्यायची दुसरीकडे कारवाया चालू ठेवायच्या हा जनतेचा खूप मोठा घात आहे़ जर प्रशासनाने कारवाई सुरू केली तर प्रशासनाच्या कारवाईला विरोध करणार आहोत, जर कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल.- धनाजी येळकर पाटील, समन्वयक, घरबचाव संघर्ष समितीउद्या होणारी संभ्याव्य कारवाई घटनेच्या मूलभूत गरजांना धरून असणारी नाही. यामुळे सरळ सरळ महाराष्ट्र शासनाच्या प्रारूप नियमावलीची पायमल्ली होणार आहे. प्राधिकरण प्रशासनाने तज्ज्ञ, विधी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच कारवाईचा विचार करणे योग्य राहील. घटनेचा अनादर करून बांधकामे पाडणे नियमांना धरूननाही, अशा अनागोंदी कारभारामुळे गरीब आणि सामान्य कुटुंबांना त्याची जास्त झळ पोहचत आहे. - विजय पाटील, समन्वयक,घरबचाव संघर्ष समिती

टॅग्स :Puneपुणे