शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

रिंगरोडबाधितांवर कारवाई? प्राधिकरण प्रशासनाकडून तयारी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 03:07 IST

रिंगरोड प्रकल्पासाठी जागा ताब्यात घेण्याची तयारी प्राधिकरण प्रशासनाने सुरू केली असून, येत्या दोन-तीन दिवसांत पोलीस बंदोबस्तात बधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

रावेत : रिंगरोड प्रकल्पासाठी जागा ताब्यात घेण्याची तयारी प्राधिकरण प्रशासनाने सुरू केली असून, येत्या दोन-तीन दिवसांत पोलीस बंदोबस्तात बधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.पिंपरी महापालिका आणि प्राधिकरणाच्या मंजूर विकास आराखड्यानुसार ३० मीटर रुंद एचसीएमटीआरचा ६५ टक्के जागेचा ताबा असून उर्वरित जागा ताब्यात घेण्याबाबत पालिका व प्राधिकरणामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. वाल्हेकरवाडी ते रहाटणीपर्यंतच्या प्राधिकरणाच्या नियोजन क्षेत्रातील एचसीएमटीआर रस्त्याच्या आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे हजारो नागरिक बेघर होणार आहेत. या कारवाईला विरोध करत रिंगरोडबाधित नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहेत. पर्यायी मार्गाने रिंगरोड वळविण्यासाठी घरबचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी नगरविकास विभागाचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांची भेट घेतली. जुलै महिन्याच्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या विरोधी पक्षांनी रिंगरोडवर सभागृहात चर्चा करण्याची मागणी ही केली होती.चिंचवडेनगर, बिजलीनगर येथील अनधिकृत बांधकामांवर कार्यवाहीची जोरदार तयारी प्रशासनाने केलीअसून, येत्या १३ आणि १४ तारखेला रिंगरोडबाधितांवर कारवाईहोण्याची शक्यता आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही़ कारवाईमुळे अनेकांना बेघर होण्याची भीती निर्माण झाली आहे.सत्ताधारी भाजपा सरकारने जनतेला दिलेला प्राधिकरणातील अनियमित घरे नियमित करण्याचा शब्द पाळला पाहिजे, खूप विश्वासाने यांना या जनतेने निवडून दिले आहे. परंतु हेही सरकार जाणीवपूर्वक रिंगरोड सह या प्रश्नाचे राजकारण करत आहे. हे आता जनतेच्या लक्षात आले आहे. सत्तेमधील काही लोकांचा या जागेवर डोळा असल्यानेच हा प्रश्न सोडविला जात नाही. एकीकडे घरे वाचवण्याची आश्वासने द्यायची दुसरीकडे कारवाया चालू ठेवायच्या हा जनतेचा खूप मोठा घात आहे़ जर प्रशासनाने कारवाई सुरू केली तर प्रशासनाच्या कारवाईला विरोध करणार आहोत, जर कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल.- धनाजी येळकर पाटील, समन्वयक, घरबचाव संघर्ष समितीउद्या होणारी संभ्याव्य कारवाई घटनेच्या मूलभूत गरजांना धरून असणारी नाही. यामुळे सरळ सरळ महाराष्ट्र शासनाच्या प्रारूप नियमावलीची पायमल्ली होणार आहे. प्राधिकरण प्रशासनाने तज्ज्ञ, विधी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच कारवाईचा विचार करणे योग्य राहील. घटनेचा अनादर करून बांधकामे पाडणे नियमांना धरूननाही, अशा अनागोंदी कारभारामुळे गरीब आणि सामान्य कुटुंबांना त्याची जास्त झळ पोहचत आहे. - विजय पाटील, समन्वयक,घरबचाव संघर्ष समिती

टॅग्स :Puneपुणे