शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
4
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
5
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
6
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
7
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
8
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
9
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
10
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
11
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
12
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
13
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
14
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
15
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
16
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
17
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
18
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
19
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
20
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?

आळंदी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रोहिंग्यांचे प्रमाण दिसून येते, हे रोहिंगे आले कोठून? आचार्य स्वामी गोविंदगिरी महाराज यांचा सवाल

By विश्वास मोरे | Updated: January 4, 2025 20:33 IST

संत संवाद कार्यक्रमात आचार्य स्वामी गोविंदगिरी महाराज बोलत होते

पिंपरी :महाराष्ट्र जागवा, महाराष्ट्र जागा ठेवा, उभा करा. महाराष्ट्र मेला, तर राष्ट्र मेले. महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले. महाराष्ट्र हा देशाचा आधार, असे मत आचार्य स्वामी गोविंदगिरी महाराजांनी शुक्रवारी रात्री आळंदीत व्यक्त केले. आळंदी-मोशी रस्त्यावरील वेदश्री तपोवन येथे आयोजित केलेल्या संत संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शांतिब्रह्म, वारकरी भूषण मारुती महाराज कुऱ्हेकर, भास्करगिरी महाराज, मंत्री राम शिंदे, पंकजा मुंडे, संत तुकाराम महाराज देवस्थानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानाचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, शंकर जगताप, अमित गोरखे आदी उपस्थित होते. संप्रदायातील मान्यवरांचा सन्मानयावेळेस संप्रदायातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी गोविंदगिरी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाची प्रतिकृती मुखमंत्र्यांना देऊन सत्कार करण्यात आला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी डोक्यात शिवरायांचा जिरेटोप डोक्यात न घालता सन्मानपूर्वक नमन करून स्वीकारला.आमची इंद्रायणी, चंद्रभागा प्रदूषण रोखायला हवेगोविंदगिरी महाराज म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे मागण्या आहेत. आपल्याला मोठी संत परंपरा आहे, वारकऱ्यांच्या छोट्या अपेक्षा आहेत. हरितवारीची क्रांती करायची आहे. आमची इंद्रायणी, चंद्रभागा प्रदूषण रोखायला हवे, नदी हा स्वच्छ करायला हवी. आजचा तरुण ड्रक्सच्या अधीन होत आहे. त्याचे प्रमाण पंजाबमध्ये अधिक आहे, पंजाब पोखरला आहे. हे ड्रगचे लोन महाराष्ट्रात येऊ नये, यासाठी प्रयत्न करायला हवेत.गोविंदगिरी महाराज म्हणाले, आळंदी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रोहिंग्यांचे प्रमाण दिसून येते, हे रोहिंगे आले कोठून? त्यांना बाहेर कोण काढणार. त्यावरही नियंत्रण आणण्याची गरज आहे. तसेच मराठ्यांचा इतिहास, शिवरायांचा खरा इतिहास तरुणांपुढे आणण्याची गरज आहे. महाराष्ट्र जागविण्याचे आणि महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम व्हावे.फेसाळलेल्या इंद्रायणीच्या पुनर्जन्माचा संकल्पमुख्यमंत्री म्हणाले, ज्या प्रकारे गंगा नदी स्वच्छ केली जात आहे, त्याचप्रमाणे इंद्रायणी, गोदावरी, चंद्रभागा या नद्या स्वच्छ बनवण्यासाठी येत्या काळात पूर्ण क्षमतेने प्रयत्न केले जाईल. फेसाळलेल्या इंद्रायणीच्या पुनर्जन्माचा संकल्प आम्ही करू.

 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAlandiआळंदीindrayaniइंद्रायणी