शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

चौदा महिन्यांमध्ये ३६० जणांना सर्पदंश, तीन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 02:46 IST

गेल्या १४ महिन्यांमध्ये यशवंतराव चव्हाण मेमोरिअल रुग्णालयामध्ये (वायसीएम) साप चावल्याप्रकरणी ३६० जणांना दाखल केले होते. त्यापैैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

- प्रकाश गायकरपिंपरी  - गेल्या १४ महिन्यांमध्ये यशवंतराव चव्हाण मेमोरिअल रुग्णालयामध्ये (वायसीएम) साप चावल्याप्रकरणी ३६० जणांना दाखल केले होते. त्यापैैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. उन्हाळ्यामध्ये उष्णतेपासून रक्षण करण्यासाठी साप मानवी वस्तीमध्ये गारव्याच्या शोधात येतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शहरातील सोसायट्या व इतर ठिकाणी साप आढळून येतात, असे सर्पतज्ज्ञांनी सांगितले.वायसीएममध्ये खेड, जुन्नर, मावळ, आंबेगाव या ग्रामीण भागामधून सर्पदंश झालेले रुग्ण दाखल होतात. याबरोबरच शहरामध्ये नदीकिनारी भागात सर्पदंशाचे प्रमाण अधिक आहे. जानेवारी २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या १४ महिन्यांमध्ये ३६० जणांना सर्पदंश झाल्याची नोंद वायसीएममध्ये आहे.उन्हाळ्यामध्ये तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत गेल्यावर ते सापांना असह्य होते. तापमान वाढल्यास साप शरीराचे तापमान नियंत्रित करण्याच्या प्रयत्न करतात. अशा वेळी साप गारवा शोधत मानवी वस्तीमध्ये प्रवेश करतात. सोसायट्यांच्या आवारातील उद्याने तसेच जमिनीवर ठेवलेल्या कुंड्या या ठिकाणी थंडावा असल्याने साप अशा ठिकाणी आश्रय घेतात. त्याचप्रमाणे चेंबरमध्येही अनेक वेळा साप आढळतात. शहर व आसपासच्या भागामधून दर वर्षी सुमारे १० ते १२ हजार साप पकडून शहराबाहेर सुरक्षित स्थळी सोडले जातात.शहरामध्ये सर्पदंशाचे प्रमाण कमी असले, तरी सापांचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याचे सर्पमित्रांना आढळून आले आहे. त्यामुळे सर्पदंशापासून सावध राहणे आवश्यक आहे.सर्पदंशानंतर रुग्णाला द्यावी लागणारी लस वायसीएममध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. ग्रामीण भागामध्ये साप चावल्यानंतर रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची तत्परता दाखवली जात नाही. त्यामुळे रुग्णाला जीव गमावावा लागू शकतो. सर्पदंश झाला तर तत्काळ रुग्णालयामध्ये दाखल करावे. - डॉ. शंकर जाधव, उपअधीक्षक,वायसीएम रुग्णालयथंडावा शोधण्यासाठी साप मानवी वस्तीमध्ये येतात. सापांना अतिथंड व अतिउष्ण दोन्हीही वातावरण सहन होत नाही. रात्रीच्या वेळी बाहेर पडताना चप्पल परिधान करूनच बाहेर पडावे, तसेच हातामध्ये टॉर्च ठेवावा. सोसायटीमध्ये अथवा इतर ठिकाणी कोठेही साप आढळल्यास त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नये. अशा वेळी दंश करण्याची शक्यता जास्त असते. सर्पमित्रांना कळवावे. जेणेकरून ते सापांना मानवी वस्तीपासून सुरक्षितपणे दूर सोडतील.- राजू कदम, सर्पमित्र

टॅग्स :snakeसापpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड