शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
3
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
4
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
5
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
6
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
7
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
8
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
9
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
10
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
11
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
12
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
13
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
14
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
15
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
16
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
17
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
18
Dashavatar: 'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
19
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
20
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास

चौदा महिन्यांमध्ये ३६० जणांना सर्पदंश, तीन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 02:46 IST

गेल्या १४ महिन्यांमध्ये यशवंतराव चव्हाण मेमोरिअल रुग्णालयामध्ये (वायसीएम) साप चावल्याप्रकरणी ३६० जणांना दाखल केले होते. त्यापैैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

- प्रकाश गायकरपिंपरी  - गेल्या १४ महिन्यांमध्ये यशवंतराव चव्हाण मेमोरिअल रुग्णालयामध्ये (वायसीएम) साप चावल्याप्रकरणी ३६० जणांना दाखल केले होते. त्यापैैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. उन्हाळ्यामध्ये उष्णतेपासून रक्षण करण्यासाठी साप मानवी वस्तीमध्ये गारव्याच्या शोधात येतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शहरातील सोसायट्या व इतर ठिकाणी साप आढळून येतात, असे सर्पतज्ज्ञांनी सांगितले.वायसीएममध्ये खेड, जुन्नर, मावळ, आंबेगाव या ग्रामीण भागामधून सर्पदंश झालेले रुग्ण दाखल होतात. याबरोबरच शहरामध्ये नदीकिनारी भागात सर्पदंशाचे प्रमाण अधिक आहे. जानेवारी २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या १४ महिन्यांमध्ये ३६० जणांना सर्पदंश झाल्याची नोंद वायसीएममध्ये आहे.उन्हाळ्यामध्ये तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत गेल्यावर ते सापांना असह्य होते. तापमान वाढल्यास साप शरीराचे तापमान नियंत्रित करण्याच्या प्रयत्न करतात. अशा वेळी साप गारवा शोधत मानवी वस्तीमध्ये प्रवेश करतात. सोसायट्यांच्या आवारातील उद्याने तसेच जमिनीवर ठेवलेल्या कुंड्या या ठिकाणी थंडावा असल्याने साप अशा ठिकाणी आश्रय घेतात. त्याचप्रमाणे चेंबरमध्येही अनेक वेळा साप आढळतात. शहर व आसपासच्या भागामधून दर वर्षी सुमारे १० ते १२ हजार साप पकडून शहराबाहेर सुरक्षित स्थळी सोडले जातात.शहरामध्ये सर्पदंशाचे प्रमाण कमी असले, तरी सापांचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याचे सर्पमित्रांना आढळून आले आहे. त्यामुळे सर्पदंशापासून सावध राहणे आवश्यक आहे.सर्पदंशानंतर रुग्णाला द्यावी लागणारी लस वायसीएममध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. ग्रामीण भागामध्ये साप चावल्यानंतर रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची तत्परता दाखवली जात नाही. त्यामुळे रुग्णाला जीव गमावावा लागू शकतो. सर्पदंश झाला तर तत्काळ रुग्णालयामध्ये दाखल करावे. - डॉ. शंकर जाधव, उपअधीक्षक,वायसीएम रुग्णालयथंडावा शोधण्यासाठी साप मानवी वस्तीमध्ये येतात. सापांना अतिथंड व अतिउष्ण दोन्हीही वातावरण सहन होत नाही. रात्रीच्या वेळी बाहेर पडताना चप्पल परिधान करूनच बाहेर पडावे, तसेच हातामध्ये टॉर्च ठेवावा. सोसायटीमध्ये अथवा इतर ठिकाणी कोठेही साप आढळल्यास त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नये. अशा वेळी दंश करण्याची शक्यता जास्त असते. सर्पमित्रांना कळवावे. जेणेकरून ते सापांना मानवी वस्तीपासून सुरक्षितपणे दूर सोडतील.- राजू कदम, सर्पमित्र

टॅग्स :snakeसापpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड