शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
3
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
4
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
5
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
6
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
7
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
8
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
9
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
10
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
11
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
12
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
13
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
14
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
15
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
16
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
17
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
18
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
20
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन

चौदा महिन्यांमध्ये ३६० जणांना सर्पदंश, तीन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 02:46 IST

गेल्या १४ महिन्यांमध्ये यशवंतराव चव्हाण मेमोरिअल रुग्णालयामध्ये (वायसीएम) साप चावल्याप्रकरणी ३६० जणांना दाखल केले होते. त्यापैैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

- प्रकाश गायकरपिंपरी  - गेल्या १४ महिन्यांमध्ये यशवंतराव चव्हाण मेमोरिअल रुग्णालयामध्ये (वायसीएम) साप चावल्याप्रकरणी ३६० जणांना दाखल केले होते. त्यापैैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. उन्हाळ्यामध्ये उष्णतेपासून रक्षण करण्यासाठी साप मानवी वस्तीमध्ये गारव्याच्या शोधात येतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शहरातील सोसायट्या व इतर ठिकाणी साप आढळून येतात, असे सर्पतज्ज्ञांनी सांगितले.वायसीएममध्ये खेड, जुन्नर, मावळ, आंबेगाव या ग्रामीण भागामधून सर्पदंश झालेले रुग्ण दाखल होतात. याबरोबरच शहरामध्ये नदीकिनारी भागात सर्पदंशाचे प्रमाण अधिक आहे. जानेवारी २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या १४ महिन्यांमध्ये ३६० जणांना सर्पदंश झाल्याची नोंद वायसीएममध्ये आहे.उन्हाळ्यामध्ये तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत गेल्यावर ते सापांना असह्य होते. तापमान वाढल्यास साप शरीराचे तापमान नियंत्रित करण्याच्या प्रयत्न करतात. अशा वेळी साप गारवा शोधत मानवी वस्तीमध्ये प्रवेश करतात. सोसायट्यांच्या आवारातील उद्याने तसेच जमिनीवर ठेवलेल्या कुंड्या या ठिकाणी थंडावा असल्याने साप अशा ठिकाणी आश्रय घेतात. त्याचप्रमाणे चेंबरमध्येही अनेक वेळा साप आढळतात. शहर व आसपासच्या भागामधून दर वर्षी सुमारे १० ते १२ हजार साप पकडून शहराबाहेर सुरक्षित स्थळी सोडले जातात.शहरामध्ये सर्पदंशाचे प्रमाण कमी असले, तरी सापांचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याचे सर्पमित्रांना आढळून आले आहे. त्यामुळे सर्पदंशापासून सावध राहणे आवश्यक आहे.सर्पदंशानंतर रुग्णाला द्यावी लागणारी लस वायसीएममध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. ग्रामीण भागामध्ये साप चावल्यानंतर रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची तत्परता दाखवली जात नाही. त्यामुळे रुग्णाला जीव गमावावा लागू शकतो. सर्पदंश झाला तर तत्काळ रुग्णालयामध्ये दाखल करावे. - डॉ. शंकर जाधव, उपअधीक्षक,वायसीएम रुग्णालयथंडावा शोधण्यासाठी साप मानवी वस्तीमध्ये येतात. सापांना अतिथंड व अतिउष्ण दोन्हीही वातावरण सहन होत नाही. रात्रीच्या वेळी बाहेर पडताना चप्पल परिधान करूनच बाहेर पडावे, तसेच हातामध्ये टॉर्च ठेवावा. सोसायटीमध्ये अथवा इतर ठिकाणी कोठेही साप आढळल्यास त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नये. अशा वेळी दंश करण्याची शक्यता जास्त असते. सर्पमित्रांना कळवावे. जेणेकरून ते सापांना मानवी वस्तीपासून सुरक्षितपणे दूर सोडतील.- राजू कदम, सर्पमित्र

टॅग्स :snakeसापpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड