शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

देशातील शेतकऱ्यांना २४ तास वीज कधी?

By admin | Updated: April 8, 2017 02:05 IST

देशातील शहरी भागामध्ये २४ तास वीजपुरवठा उपलब्ध असतो;

पिंपरी : देशातील शहरी भागामध्ये २४ तास वीजपुरवठा उपलब्ध असतो; परंतु आजदेखील ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांना लोडशेडिंगचा सामना करावा लागतो आणि रात्र रात्र जागून शेतीला पाणी द्यावे लागते. ही देशभरातील शेतकऱ्यांची व्यथा खासदार श्रीरंग बारणे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे लोकसभेत मांडली. बारणे म्हणाले, ‘‘सध्याचे सरकार सत्तेवर आल्यानंतर कोळशापासून व अन्य वीजनिर्मितीच्या मार्गाने देशातील विजेचे उत्पन्न वाढल्याचे एकंदर अहवालावरून दिसते. परंतु देशभरातील शेतकऱ्याला आजदेखील लोडशेडिंगचा सामना करावा लागतो. वीजवाटप हा जरी राज्य सरकारच्या अखत्यारितील प्रश्न असला, तरी देखील शेतकऱ्यांना २४ तास वीज कधी मिळणार?’’ या तारांकित प्रश्नावर यावर केंद्रीय कोळसा खाण व ऊर्जामंत्री पीयूष गोयल म्हणाले, ‘‘विजेचे उत्पन्न मागील सरकारच्या तुलनेने वाढले आहे. शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. राज्यातील विजेवरील पूर्ण नियंत्रण हे जरी राज्याकडे असले, तरी केंद्रातून तशा सूचना देण्यात येतील.’’(प्रतिनिधी)