शुभांशू शुक्ला अंतराळात घेऊन जाणार होते आमरस अन् शिरा! पण हे पदार्थ खराब नाही होणार का? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 18:00 IST
1 / 7अंतराळवीर जेव्हा अवकाश प्रवासासाठी निघतात, तेव्हा स्वतःसोबत संपूर्ण मोहिमेत पुरेल इतके पदार्थ घेऊन जातात. यामध्ये अंतराळवीरांच्या आवडीचे पदार्थ देखील असतात. पण इतके महिने हे पदार्थ टिकून कसे राहतात? हा प्रश्न अनेकांच्या मनात आला आहे. चला तर जाणून घेऊया... 2 / 7अॅक्सिओम मिशन-४ पुढे ढकलण्यात आले. पण, या मिशनमुळे कॅप्टन शुभांशू शुक्ला हे चर्चेत आले आहेत. भारतीय हवाई दलाचे पायलट आणि अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला या मोहिमेसाठी सोबत आमरस, मूग डाळ आणि गाजर हलवा घेऊन जाणार होते. 3 / 7आता त्यांची मोहीम पुढे ढकलली गेली असली, तरी आता या आधीच पॅक्ड केलेल्या पदार्थांचे काय होणार आणि जर हे पदार्थ अवकाशात पाठवले तर, ते खराब नाही होणार का हा प्रश्न उपस्थित झाला आहे.4 / 7तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अवकाशात अन्न खराब होण्याची प्रक्रिया पृथ्वीवर असते तशी नाही. तेथील वातावरण वेगळे असते. अवकाशात शून्य दाब आहे. तिथे हवा नाही. जीवाणू आणि बुरशी ऑक्सिजनशिवाय जगू शकत नाहीत. अन्न कुजण्यास कारणीभूत असणारे घटक अवकाशात नसतात. तसेच, हवा लागू नये म्हणून अंतराळयान देखील पूर्णपणे सील केलेले असते.5 / 7जेव्हा अन्नाचे ऑक्सिडायझेशन होत नाही आणि तापमानाचा त्यावर परिणाम होत नाही, तेव्हा ते बराच काळ सुरक्षित राहते. अवकाशातील तापमान खूप कमी असते, त्यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशी सक्रिय राहू शकत नाहीत. परिणामी, येथे अन्न खराब होण्याचा धोका कमी असतो.6 / 7अवकाशात यात्रेत प्रामुख्याने दोन प्रकारचे अन्न सोबत नेले जाते. पहिले म्हणजे फ्रीज-ड्रायिंग अन्न. हे असे अन्न आहे, ज्याचे पाणी आधीच काढून टाकले जाते, जेणेकरून त्यात बॅक्टेरिया वाढू शकत नाहीत. दुसरे म्हणजे खाण्यासाठी तयार असणारे अन्न. ते इतक्या उष्णतेवर शिजवले जाते की, सर्व सूक्ष्मजीव मरतात.7 / 7मात्र, जर अन्न योग्यरित्या पॅक केले नसेल, ते गळते. या अन्नाचे तापमान नियंत्रित करण्यात समस्या येते. अन्नातील ओलावा कमी होत राहतो आणि ते अन्न खराब होऊ शकते.मात्र, जर अन्न योग्यरित्या पॅक केले नसेल, ते गळते. या अन्नाचे तापमान नियंत्रित करण्यात समस्या येते. अन्नातील ओलावा कमी होत राहतो आणि ते अन्न खराब होऊ शकते.