1 / 4मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्यांची चाळण झाली असून, आपण रस्त्यावरून प्रवास करतोय की खड्ड्यातून हाच प्रश्न वाहनचालकांना पडला आहे. पहिल्याच पावसात रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्डयांत पाणी साचत असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. (Photo Credit: X/@carvesone)2 / 4पहिल्याच पावसानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून देखभाल करण्यात येणाऱ्या सर्व्हिस रोडची अवस्था किती वाईट झाली आहे हे उघड झाले आहे. (Photo Credit: X/@carvesone)3 / 4लोनेरे या एका छोट्या गावात, जिथे उड्डाणपूल बांधला जात आहे, तिथे मुसळधार पावसामुळे सर्व्हिस रोडवर मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहतूक कोडींसारख्या समस्याला तोंड द्यावे लागत आहे. (Photo Credit: X/@carvesone)4 / 4राष्ट्रीय महामार्ग विभागाने हे रस्ते खडी टाकून बुजवण्याचा प्रयत्न केला असला तरी वाहनचालकांना या रस्त्यावरून जाताना त्रास सहन करावा लागत आहे. (Photo Credit: X/@carvesone)