By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 19:36 IST
1 / 5ई-केवायसीसाठी काय करावे लागणार? : कर्मचाऱ्यांना त्यांच्या आधारकार्डावरील माहितीची पडताळणी करावी लागेल. यामध्ये बायोमेट्रिक, ओटीपी आधारित प्रमाणीकरण करून वैयक्तिक माहिती डेटाबेसशी जुळवून घ्यावी लागेल.2 / 5'लाडकी बहीण'मध्येही उकळला लाभ: पगाराव्यतिरिक्त काही कर्मचाऱ्यांनी 'लाडकी बहीण' योजनेचाही अनधिकृतपणे लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. शासकीय यंत्रणेत असून, लाभ घेतल्यास कारवाई होईल.3 / 5कशामुळे घेतला ई-केवायसीचा निर्णय ? : काही कर्मचाऱ्यांनी सिस्टीममधील त्रुटींचा फायदा घेत दोन वेगवेगळ्या ठिकाणी नोंदणी केली होती. या दुबार नोंदणीमुळे एकाच व्यक्तीच्या नावावर दोनदा पगार उचलला जात असल्याचे ऑडिटमध्ये समोर आले. हा गैरप्रकार थांबवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.4 / 5बनावट नोंदी शोधण्यासाठी निर्णय : राज्यातील सर्व शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि निमशासकीय संस्थांमधील कर्मचाऱ्यांना आता आपली ओळख पटवण्यासाठी ई-केवायसी करावी लागणार आहे. पारदर्शकता आणण्यासाठी आणि बनावट नोंदी शोधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.5 / 5आधार संलग्न बँक खाते द्यावे लागणार : नव्याने नोंदणी करताना किंवा माहिती अद्ययावत करताना कर्मचाऱ्यांना 'आधार संलग्न' बँक खातेच द्यावे लागणार आहे. शासनाचा पगार आता थेट 'डीबीटी'प्रमाणे आधार लिंक खात्यातच होईल.