By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 16:55 IST
1 / 5लग्नानंतर बहुतांश जोडप्यांमध्ये कुटुंबातील सदस्यांवरुन मतभेद निर्माण होतात. त्यामुळे लग्नानंतर आपण कुठे, कसं रहायचं या मुद्यांवर जोडीदारांबरोबर जरुर चर्चा करा. 2 / 5लग्नानंतर लैंगिक सुख खूप महत्वाचे असते. त्यामुळे लैंगिक आयुष्याबद्दलही जरुर चर्चा करा. अनेक विवाह मोडण्यामध्ये हे सुद्धा एक महत्वाचे कारण असते. 3 / 5अनेकदा लग्नानंतर जोडीदारांचे मुलांबद्दलचे विचार परस्परांशी जुळत नाहीत. मुलांच्या जन्माचे प्लानिंग, त्यांचे पालनपोषण, त्यांचे शिक्षण याबद्दलच्या विचारात मतभिन्नता असेल तर पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो.4 / 5आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी अनेकदा स्वत:ची आर्थिक स्थिती लपवली जाते. त्यामुळे लग्न करताना आपल्या जोडीदाराची आर्थिक स्थितीची सर्व माहिती घ्या.5 / 5अनेकदा विवाह मोडण्यामध्ये प्रोफेशनल लाइफ खूप मोठे कारण असते. एखाद्यावेळी नोकरीच्या निमित्ताने बाहेर जावे लागते किंवा घरी यायला उशिर होतो अशावेळी जोडीदाराने समजून घेणे महत्वाचे असते.