अमळनेरमध्ये आजपासून सारस्वतांची मांदियाळी, ग्रंथ दिंडीस सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 10:22 IST
1 / 6जळगाव : साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर येथे ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरूवात आजपासून होत आहे.2 / 6त्यानिमित्त ग्रंथ दिंडीस सुरुवात झाली असून साहित्यिकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 3 / 6या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यभरातील अनेक साहित्यिकांसह रसिक अमळनेरात दाखल झाले आहेत. 4 / 6तसेच यावेळी साहित्यिकांसह दिग्गज मंत्री सुद्धा या साहित्य संमेलनास हजेरी लावणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या साहित्य संमेलनकडे लागले आहे. 5 / 6सुमारे ७२ वर्षानंतर अमळनेरकरांना ही संधी मिळाली असून हे संमेलन २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान अविस्मरणीय ठरावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.6 / 6आज सकाळी साडेसात वाजता ग्रंथदिंडीस प्रारंभ झाला. ग्रंथदिंडीचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते झाले. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.