1 / 10चीनचा सर्वात महत्त्वाचा प्रकल्प चीन पाकिस्तान आर्थिक मार्ग बंडखोरांच्या टार्गेटवर आहे. पाकिस्तान बंडखोरांना नियंत्रणात आणू शकत नाही. ज्यामुळे चीनचा पाकिस्तानवरील भरवसा उडाला आहे. त्यामुळे चीन थेट बलूच बंडखोरांसोबत डील करत आहे. चीनच्या नव्या खेळीने शाहबाज शरीफ आणि असीम मुनीरची झोप उडाली आहे.2 / 10सूत्रांनुसार, आता बलूचिस्तान प्रांतात गुंतवणूक सुरक्षित करत रखडलेल्या चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गाला चालना देण्यासाठी चीनने पाकिस्तानी सैन्याला बाजूला केले आहे. चीन बलूचमधील समुहासोबत थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याचं समोर आले आहे. चीनने त्यांचा इरादा अलीकडेच बीजिंग दौऱ्यावर गेलेल्या पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनाही औपचारिक सांगितला. 3 / 10चीनची ही इच्छा CPEC प्रकल्पाला सातत्याने मिळणाऱ्या धमक्यातून निर्माण झाली. बलूचमधील बंडखोर सातत्याने या प्रकल्पाच्या कामाला टार्गेट करत आहेत. चीनने यात ६० बिलियन डॉलरहून अधिक गुंतवणूक केली आहे. ग्वादर पोर्ट ते रेको डिक परियोजनेत खूप कमी प्रगती झाली आहे. त्यामुळे हे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी चीनवर दबाव आहे. CNN-News18 ने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे.4 / 10अमेरिकेने बलूचिस्तानातील भव्य खनिज संपत्तीत रस दाखवला आहे. त्यामुळे चीन हे प्रकल्प वेगाने पुढे नेण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याशिवाय बेल्ड अँन्ड इनिशिएटिव्ह भागीदारांना सकारात्मक संकेत देत बलूच बंडखोरांसोबत थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. 5 / 10चीनने एक दशकाहून अधिक काळ संघर्ष केला आहे. त्यानंतर आता बलूचिस्तानात खऱ्या अर्थाने सुरक्षा बलूच बंडखोरच देऊ शकतात हे त्यांच्या लक्षात आले. केवळ पाकिस्तानी सैन्यावर निर्भर राहणे चीनला आता शक्य नाही. त्यामुळे थेट संवादातून बंडखोरांचे हल्ले थांबवणे, चीनी कर्मचाऱ्यांना सुरक्षा देणे, कुठल्याही अडथळ्याशिवाय खनिजे काढणे सुरू राहील असा चिनी अधिकाऱ्यांचा तर्क आहे.6 / 10परंतु बलूचिस्तानच्या लोकांना चीनवर विश्वास नाही. काही गट संवादाचे समर्थन करत आहेत तर काहींनी चीनच्या हेतूवर संशय घेतला आहे. बलूच बंडखोरांमध्ये प्रमुख मागण्यांवरून फूट आहे. ज्यात स्वायत्तता, सैन्य अभियान संपवणे यांचा समावेश आहे. कुठल्याही औपचारिक चर्चेच्या आधी चीनला प्रत्येक समुहासोबत वेगवेगळा संपर्क साधावा लागणार आहे.7 / 10बलूचिस्तानात तांबे, सोने, लिथियम यासारखी नैसर्गिक संपत्ती आहे. ज्यामुळे चीनची महत्त्वाकांक्षा वाढली आहे. चीन कथितपणे CPEC मार्गावर पोलीस चौक्या बनवू इच्छितो. ज्याला बलूचमधील लोकांनी तीव्र विरोध केला आहे. चीनसोबत भागीदारी केवळ चीनलाच फायद्याची ठरेल. बलूच त्यांचे अस्तित्व गमावून बसेल आणि पाकिस्तान या क्षेत्रावरील नियंत्रण घालवू शकतो असंही बोलले जाते. 8 / 10ग्वादर पोर्टातून जमा होणारा महसूल चीनला ९१ टक्के मिळतो. ज्यातून स्थानिक समुदायांकडे किरकोळ हिस्सा राहतो. या असंतुलनातून बलूचमधील लोकांमध्ये नाराजी आहे. ज्यांना त्यांच्या भूमीतील लाभात फारसा वाटा मिळत नाही. त्यातून बलूच बंडखोर चिनी प्रकल्पांवर सातत्याने हल्ला करतात. त्यात अनेक चिनी अभियंत्यांचा जीव गेला आहे.9 / 10चीन कुठल्याही परिस्थितीत त्यांचे प्रकल्प सुरक्षित ठेवू इच्छितो त्यासाठी बलूच बंडखोरांसोबत संपर्क साधण्याचा चीनचा प्रयत्न आहे. परंतु चिनी खेळीने पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचा अपमान होत आहे. चीनला पाकिस्तानी सरकारवर विश्वास राहिला नाही. बलूचिस्तानच्या अनेक प्रांतात पाकिस्तानी सैन्याचे नियंत्रण राहिले नाही त्यामुळे चीनचे प्रकल्प धोक्यात आले आहेत.10 / 10चीनच्या संवादाच्या प्रयत्नावर बलूच लोकांचा विश्वास नाही. २०१९ मध्येही दुबईमध्ये अशाप्रकारे गुप्त वार्ता करण्यात आली परंतु त्यात यश आले नाही. बलुचिस्तानला स्वायत्तता आणि सीपीईसीमधून मिळणाऱ्या उत्पन्नात बलुचिस्तानला वाटा मिळावा अशी बलुचिस्तानची मागणी आहे.