फराळाचा दणका आणि पोटात 'जाळ'; दिवाळीत अॅसिडिटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'हे' ७ सोपे उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 19:04 IST
1 / 7दिवाळीचा आनंद फराळात आहे, पण अतिगोड आणि तेलकट पदार्थांमुळे पचनक्रियेवर ताण येतो. त्यामुळे फराळ खाताना अॅसिडिटीचा जाळ टाळण्यासाठी प्रमाण नियंत्रित ठेवायला हवं.2 / 7दिवाळीच्या उत्साहात गोड-तिखट फराळाचे पदार्थ चवीने खाल्ले जात असले तरी त्यामुळे पोटात जळजळ, आम्लपित्तची समस्या भेडसावते. तेलकट, तुपकट, मसालेदार पदार्थाचे अति सेवन, कमी पाणी पिल्यामुळेही अॅसिडिटी वाढते असे तज्ज्ञ सांगतात.3 / 7फराळामुळे अॅसिडिटी झाल्यास लगेच औषधे न घेता, नैसर्गिक उपायांचा आधार घ्या. ताक, ओवा किंवा लिंबू-मध मिश्रित कोमट पाणी हे साधे घरगुती उपाय तुम्हाला तात्काळ आराम देऊ शकतात.4 / 7तेलकट पदार्थ पचवण्यासाठी शरीराला अधिक पाण्याची गरज असते. फराळ करत असताना कमी पाणी पिणे हे अॅसिडिटी वाढण्याचे मोठे कारण आहे. त्यामुळे, 'अॅसिडिटी टाळा, पाणी प्या' हा नियम कटाक्षाने पाळा.5 / 7केवळ दिवाळीपुरते नव्हे, तर पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप आवश्यक आहे. अॅसिडिटी टाळण्यासाठी जंक फूड आणि तेलकट पदार्थ कायमचे टाळण्याचा संकल्प करा.6 / 7केवळ दिवाळीपुरते नव्हे, तर पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप आवश्यक आहे. अॅसिडिटी टाळण्यासाठी जंक फूड आणि तेलकट पदार्थ कायमचे टाळण्याचा संकल्प करा.7 / 7केवळ दिवाळीपुरते नव्हे, तर पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप आवश्यक आहे. अॅसिडिटी टाळण्यासाठी जंक फूड आणि तेलकट पदार्थ कायमचे टाळण्याचा संकल्प करा.