1 / 10कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यापासून अनेकविध संकटांना सामान्य नागरिक सामोरे जात आहेत. बेरोजगारीत झालेली वाढ, वाढती महागाई यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. 2 / 10कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यापार यांचे कंबरडेच मोडले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे.3 / 10त्यातूनही आता हळूहळू देश सावरताना दिसत आहे. असे असले, तरी रॉयटर्सने केलेल्या एका सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. 4 / 10रॉयटर्सने ग्रामीण भारतातील मोठ्या राज्यांमधील ८ गावांतल्या ७५ कुटुंबांची भेट घेतली. यानंतर असे लक्षात आले की, या लोकांचं घरटी उत्पन्न सरासरी ७५ टक्क्यांनी घटले असून, यापैकी दुपटीपेक्षा जास्त हिस्सा कर्जातच जातो.5 / 10मार्च २०२० पासून उधारी मागण्यामध्ये तिप्पट वाढ झाली आहे आणि त्यापैकी अर्ध्याहून अधिक उधारी ही गेल्या सहा महिन्यातली आहे, असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. 6 / 10या ७५ कुटुंबांचे एकूण उत्पन्न करोनाकाळापूर्वी साधारण ८ लाख १५ हजार रुपये होते. मात्र आता ते केवळ २ लाख २० हजारांवर आले आहे.7 / 10उत्तर भारताच्या एका कोपऱ्यातल्या छोट्याश्या गावात राहणाऱ्या आशा देवी. सात माणसांना पोसता यावं म्हणून त्या आत्तापर्यंत किती वेळा उपाशी झोपल्यात याचा त्यांनाही ताळमेळ लागत नाही, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. 8 / 10२० हजाराच्या कर्जासाठी त्यांना आपली जमीन गहाण ठेवावी लागली. पैश्यांअभावी त्यांनी दुध घेणं बंद केलं, तेलाचा वापर कमी केला आणि डाळी तर दहा-बारा दिवसांतून एकदाच शिजवल्या जातात. 9 / 10पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरिबांना मोफत धान्याची सोय तर केली. मात्र एका परिवाराला हे धान्य पुरेसे नाही, असे आशा देवी यांनी यावेळी सांगितले. असे अनेक परिवार ग्रामीण भारतात पाहायला मिळतात. 10 / 10जगच थांबल्याने हातावर पोट असलेल्यांचे जगही थांबल्याचे विदारक सत्य या सर्वेक्षणातून समोर आल्याचे सांगितले जात आहे. अनेक परिवारांना तर आपला वडिलोपार्जित व्यवसाय गुंडाळून बसावे लागत आहे.