शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

"चीन १०० वर्षांच्या योजना आखतो, भारत भूतकाळात अडकलाय," दिग्गजानं फरक समजावून केलं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 08:58 IST

1 / 7
बिग बझारचे संस्थापक किशोर बियाणी यांनी एका पॉडकास्टमध्ये भारत आणि चीनमधील फरकाबद्दल अनेक मोठ्या गोष्टी सांगितल्या आहेत. जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी भारताला सांस्कृतीक जोडखंडातून मुक्त व्हावं लागेल, असं ते म्हणाले. उद्योजकतेच्या नवनव्या कथा निर्माण कराव्या लागतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
2 / 7
त्यांनी भारताची तुलना चीनच्या दीर्घकालीन नियोजन आणि तंत्रज्ञानाधारित बदलाशी केली. थिंक स्कूलनं आयोजित केलेल्या पॉडकास्टमध्ये बियाणी यांनी यावर वक्तव्य केलं. 'चीन १०० वर्षांच्या योजना बनवतो. त्यांनी आपले भवितव्य घडविण्यासाठी आपला भूतकाळ नष्ट केलाय. चीन शिक्षण, डिझाईन आणि डीप टेकमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे,' असं बियाणी म्हणाले.
3 / 7
बियाणी यांनी चीनच्या डिझाइन, इनोव्हेशन-आधारित अर्थव्यवस्थेकडे होणाऱ्या बदलाचे कौतुक केलं. चीन दरवर्षी ८५,००० उच्च-गुणवत्तेचे डिझायनर आणि २,५०,००० अभियंते तयार करतो. याउलट, बियाणी यांनी असा युक्तिवाद केला की भारत अजूनही सांस्कृतिकदृष्ट्या त्याच्या भूतकाळाशी जोडलेला आहे, असं त्यांनी नमूद केलं.
4 / 7
कुटुंबं मुलांना कसं शिक्षण देतात हे परंपरा आणि पौराणिक कथांवर अवलंबून असते. आमच्या पालकांना त्यांना जे योग्य वाटतं ते आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत होते आणि आम्ही तेच सर्व पुढे नेतो. हे सर्व विकास किंवा उद्योगाशी जोडलेलं नाहीये, असंही ते म्हणाले.
5 / 7
बियाणी यांनी नरेटिव्ह बदलण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले की आपल्याला उद्योजकता आणि विकासाच्या नवीन कथा तयार करण्याची आवश्यकता आहे. बियाणी यांनी पॉडकास्टचं या बदलाला चालना देण्यासाठी एक आधुनिक साधन म्हणून वर्णन केलं. त्यांनी भारतासाठी रोडमॅप म्हणून चीनच्या विकास मॉडेलकडे लक्ष वेधलं. यामध्ये शहरं, कार्यक्षम पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक्स नेटवर्क यांचा समावेश आहे.
6 / 7
उत्तर प्रदेश सरकारने श्रेणी-विशिष्ट उत्पादनांसाठी शहरे निर्माण करण्यासाठी काही पावलं उचलली आहेत. परंतु, चीनच्या गतीशी जुळवून घेण्यासाठी अजून बरंच काही करण्याची आवश्यकता असल्याचंही बियाणी यांनी स्पष्ट केलं. बियानी यांनी मान्य केलं की, भारतानं महामार्ग आणि पायाभूत सुविधांची उभारणी केली आहे. परंतु, आता पुढील टप्प्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. उद्योजकांचे सक्षमीकरण यात अग्रस्थानी आहे.
7 / 7
चीन भविष्याचा विचार करतो, तर भारत अजूनही भूतकाळात अडकला आहे. चीननं आपल्या जुन्या कल्पना सोडून नवीन तंत्रज्ञान आणि डिझाइनवर लक्ष केंद्रित केलं आहे. ते दरवर्षी बरेच अभियंते आणि डिझायनर तयार करतात, असं बियाणी यांनी नमूद केलं.
टॅग्स :chinaचीनIndiaभारतEconomyअर्थव्यवस्थाbusinessव्यवसाय