शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

जिल्हा परिषद:स्थायी समितीची बैठक स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 00:40 IST

राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत निवडण्यात आलेल्या ७२ गावांवरुन वाद झाल्याने जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची गुरुवारी होणारी बैठक स्थगित करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत निवडण्यात आलेल्या ७२ गावांवरुन वाद झाल्याने जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची गुरुवारी होणारी बैठक स्थगित करण्यात आली आहे.जिल्हा परिषदेत गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास स्थायी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी जि.प.अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांच्या कक्षात पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत विविध मुद्यांवर बरीच वादावादी झाली. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत निवडण्यात आलेल्या ७२ गावांवर यावेळी सदस्यांनी आक्षेप घेतला. सीईओं बी.पी.पृथ्वीराज यांनी सदस्यांना विश्वासात न घेता गावांची निवड केली असल्याचा आरोप उपस्थित पदाधिकाºयांनी केला. त्यावर पृथ्वीराज यांनी निकषामध्ये बसणाºया गावांचीच आपण निवड केली, असे सांगितले. यावेळी काही सदस्यांनी गावांची निवड करताना सदस्यांशी चर्चा करणे आवश्यक होते, असे सांगितले.या विषयावरुन वातावरण गरम झाल्यानंतर काही सदस्यांनी वैयक्तिक विषयही बैठकीत मांडण्यास सुरुवात केली. तत्कालीन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांनी अभियंता दादेवाड यांची जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत बदली केली होती. ती बदली रद्द करुन दादेवाड यांना परत जिल्हा परिषदेत घ्यावे, यासाठी काही सदस्य गेल्या दोन महिन्यांपासून प्रयत्न करीत आहेत; परंतु, सीईओं पृथ्वीराज हे त्यास तयार नाहीत. गुरुवारच्या बैठकीतही हा विषय आला; परंतु, सदस्यांची मागणी पृथ्वीराज यांनी फेटाळली. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वसूकर हे ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा पदभार वरिष्ठ अभियंता खान यांच्याकडे देण्याचा पृथ्वीराज यांनी निर्णय घेतला; परंतु, काही सदस्यांनी इतर अभियंत्यांची नावे सूचविली. त्यालाही पृथ्वीराज यांनी नकार दिला. त्यामुळे या बैठकीत चांगलीच गरमागरमी झाली. शेवटी उपस्थितांनी गुरुवारची स्थायी समितीची बैठक स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :parabhaniपरभणीzpजिल्हा परिषदWaterपाणी