शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

बलसा गावात १२ वाजेपर्यंत शून्य टक्के मतदान; जिल्हाधिऱ्यांच्या चर्चेनंतर बहिष्कार मागे

By राजन मगरुळकर | Updated: April 26, 2024 12:21 IST

गावाच्या परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न सोडवावा, यासाठी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता.

परभणी : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला शुक्रवारी सकाळी सात वाजता जिल्ह्यात सुरुवात झाली. मात्र, परभणी शहराजवळ खानापूरलगत असलेल्या बलसा खू. या पुनर्वसित गावामध्ये दुपारी बारा वाजेपर्यंत एकही ग्रामस्थांनी मतदान केले नाही. 

गावाच्या परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न सोडवावा, यासाठी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. हा प्रकार समजतात तत्काळ जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे हे वरिष्ठ विभागीय अधिकाऱ्यांसह गावामध्ये दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढून विविध प्रश्नाबाबत लेखी पत्र देऊन समस्या सोडविण्याचे ग्रामस्थांना आश्वासन दिले. मतदान हा मूलभूत हक्क असून तो आपण बजावावा असे त्यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी सदरील आश्वासनानंतर बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगितले. 

या गावातील पाणी, वीज सोबतच मूलभूत समस्यांच्या प्रश्नावरही ग्रामस्थांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे साकडे घातले व समस्या मांडल्या. गावाच्या परिसरात होणारे वीज चोरी, विजेचे आकडे याबाबत सुद्धा प्रशासनाने पाऊल उचलावे अशी मागणी ही ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी पोलीस प्रशासनाचे पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांच्यासह निवडणूक निरीक्षक, फिरते पथक आणि मतदान केंद्राचे विविध पथक गावामध्ये आले होते.

अखेर बहिष्कार मागे ग्रामस्थांनी गावातील ग्रामपंचायत समोर उद्घोषणा करून मतदान बहिष्कार मागे घेतल्याचे आता जाहीर केले. त्यानंतर पहिला मतदार केंद्रावर दाखल झाला आहे. आता ग्रामस्थ येथून रवाना होऊन मतदान केंद्रावर मतदानासाठी येत आहेत.

टॅग्स :parbhani-pcपरभणीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४