शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

शिवसेना पीक विमा प्रश्नावर गप्प का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : एकेकाळी पीक विम्यासाठी संबंधित कंपनीवर मोर्चा काढणारी शिवसेना आता या प्रश्नावर गप्प का आहे? ...

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणी : एकेकाळी पीक विम्यासाठी संबंधित कंपनीवर मोर्चा काढणारी शिवसेना आता या प्रश्नावर गप्प का आहे? असा प्रश्न विचारत आमदार मेघना बोर्डीकर यांनी कृषिमंत्र्यांच्या गोलगोल उत्तराचा शुक्रवारी सभागृहात निषेध केला.

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक विमा अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. या अनुषंगाने विधानसभेत शुक्रवारी उपस्थित झालेल्या मुद्द्यावर बोलताना जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्या म्हणाल्या की, शेतकऱ्यांच्या बांधावर जावून हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द दिला होता. २०१९ विधानसभा निवडणुकीच्या आधी याच शिवसेनेने पीक विमा कंपन्यांच्या कार्यालयावर शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा, यासाठी मोर्चे काढले होते. शिवसैनिकांनी विमा कंपनीचे कार्यालय फोडले होते. आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. असे असताना विमा कंपन्या शेतकऱ्यांना दाद देत नाहीत. विम्यासाठी शेतकऱ्यांची परवड सुरू आहे. विमा मिळत नाही तरीही शिवसेनेचे मंत्री आणि शिवसैनिक आता गप्प का? शिवसेनेची तेव्हाची आणि आताची भूमिका यात तफावत दिसून येत आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री सरकारमध्ये असल्याने पीक विमा कंपन्यांना पाठीशी घालत आहेत का? असा प्रश्नही त्यांनी विचारला. कृषिमंत्री दादा भुसे हे याविषयी ठोस उत्तर देत नसून, गोलगोल उत्तर देत असल्यामुळे आमदार बोर्डीकर यांनी त्यांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली.