शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१९ पासून सोशल मीडियावर डॉक्टरांचं ब्रेनवॉश; व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्युल तपासात मोठा खुलासा
2
Baramati Nagar Parishad: "आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी २० लाख देऊन फोडले", युगेंद्र पवारांच्या आरोपाने बारामतीत खळबळ
3
बाँड्समध्ये जास्त रिटर्न, पण जोखीम किती? FD मध्ये ₹५ लाखांची सुरक्षा; गुंतवणुकीचा योग्य फॉर्म्युला काय?
4
IND vs SA : गुवाहाटीत द. आफ्रिकेचं “समद ओकेमध्ये हाय…”; भारताचे 'शेर' पहिल्या डावात सपशेल ढेर!
5
उत्तर प्रदेशमध्ये संशयित ४०० बँक खाती तपासली; जम्मू आणि काश्मीरमधील डॉक्टरांचे  लागेबांधे
6
लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मंधानाने अचानक इंस्टाग्रामवरून काढून टाकल्या 'या' खास पोस्ट
7
"जिथे जोगतीणींची लग्न लागतात तिथेच शूटिंग झालं...", मुक्ता बर्वेने सांगितला 'जोगवा'चा अनुभव, म्हणाली...
8
"अक्षय कुमारच्या आईची भूमिका साकारुन मी स्वतःची कबर खोदली"; बॉलिवूड अभिनेत्रीला होतोय पश्चाताप
9
Paytm च्या फाऊंडरचं बिल झालं व्हायरल; ₹४०,००० च्या जेवणावर वाचवले ₹१६,०००, कशी झाली ही कमाल
10
Astro Tips: कर्जाचा पहिला हप्ता मंगळवारीच का फेडावा? जाणून घ्या ज्योतिषीय आणि धार्मिक कारण!
11
पेशावर हादरलं! निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर मोठा आत्मघाती हल्ला; गोळीबारात तीन दहशतवादी ठार
12
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पंकजा मुंडेचे PA अनंत गर्जे यांना अटक, आज कोर्टात हजर करणार !
13
"गोंधळ घालायचा असेल तर येऊ नका...", कार्यक्रमात झालेल्या राड्यानंतर गौतमी पाटीलचं आवाहन
14
IND vs SA : गुवाहाटी कसोटी जिंकण्यासाठी शास्त्रींचा टीम इंडियाला 'अजब-गजब' सल्ला; म्हणाले...
15
अनपेड इंटर्नशिप ते कमी पगाराच्या पहिल्या नोकरीपर्यंत, नवीन लेबर कोडमुळे तरुणांचे बदलणार आयुष्य
16
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex १९५ अंकानी वधारला; Nifty २६,१०० च्या पार, 'या' शेअर्समध्ये तेजी
17
Sangli Accident: नशेत राँग साईडने निघाला, ६ गाड्या उडवल्या, अनेक जखमी; संतप्त लोकांनी स्कोडा कार फोडली
18
"मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक असेल, त्यानंतर..."; राज ठाकरेंचा 'मराठी माणसा'ला सावध राहण्याचा इशारा
19
म्युच्युअल फंडावर टॅक्स कसा लागतो? इक्विटी आणि डेट फंडसाठीचे नियम काय, टॅक्स वाचवण्याचे मार्ग जाणून घ्या
20
भारताच्या 'दुर्गा' सीमेचं रक्षण करणार, चीन सीमेवर महिला कमांडो; १० चौक्या उभ्या राहणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील एसटीची चाके पुन्हा थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:13 IST

परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्याचा समावेश पुन्हा तिसऱ्या स्तरात झाला असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोमवारपासून एस. टी. महामंडळाची बससेवा ...

परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्याचा समावेश पुन्हा तिसऱ्या स्तरात झाला असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोमवारपासून एस. टी. महामंडळाची बससेवा बंद करण्यात आली. त्यामुळे दररोज होणाऱ्या २०० बसफेऱ्या ठप्प पडल्या असून, यातून महामंडळाचे २० लाख रुपयांचे नुकसान झाले.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने दोन आठवड्यांपूर्वी सर्व व्यवहार पूर्ववत झाले होते. एस. टी. महामंडळाची बससेवाही सुरू करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली. मात्र राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्यस्तरावरून सर्वच ठिकाणी तिसऱ्या स्तराचे निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधानुसार सोमवारपासून जिल्ह्यातील व्यवहार सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सार्वजनिक वाहतूक ३ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानुसार २८ जूनपासून जिल्ह्यातील एस. टी. बसवाहतूक बंद करण्यात आली आहे. सकाळपासून जिल्ह्यात एकही बस धावली नाही. त्याचप्रमाणे बाहेर जिल्ह्यातील बसही जिल्ह्यात दाखल झाली नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

दरम्यान, एस. टी. महामंडळाच्या परभणी विभागातून परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यात मिळून दररोेज २५० फेऱ्या होतात. त्यापैकी परभणी जिल्ह्यातील २०० बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यात जिल्ह्यांतर्गत व जिल्ह्याबाहेरील बसफेऱ्यांचा समावेश आहे. अचानक बससेवा ठप्प झाल्याने सोमवारी दिवसभरात सुमारे २० लाख रुपयांचे महामंडळाच्या परभणी विभागाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, इतर जिल्ह्यांचाही तिसऱ्या स्तरात समावेश असताना त्या ठिकाणी एस. टी. बससेवा सुरू आहे. मात्र परभणी जिल्ह्यात ही सेवा बंद केल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

प्रवाशांची वाढली गैरसोय

सोमवारपासून एस. टी. महामंडळाची बससेवा बंद झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. विशेष म्हणजे बाहेर जिल्ह्यातूनही बसेस जिल्ह्यात धावल्या नाहीत. त्यामुळे प्रवासाचा बेत आखलेल्या प्रवाशांच्या गैरसोयीत भर पडली.

बसस्थानके पुन्हा ओस

सोमवारपासून बससेवा बंद राहिल्याने बसस्थानके ओस पडली होती. दोन आठवड्यापर्यंत जिल्ह्यात बसस्थानकांवर प्रवाशांची संख्या वाढत होती. मात्र सोमवारी ही सेवा बंद केल्याने बसस्थानके प्रवाशांविना ओस पडल्याचे दिसून आले.