शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
4
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
5
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
6
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट
7
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
8
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
9
OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
10
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
11
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
12
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
13
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
14
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
15
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
17
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
18
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
19
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
20
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलींचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले

बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय? शासन विचारात; विद्यार्थी संभ्रमात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:20 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याने राज्य शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याने राज्य शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी बारावीच्या विद्यार्थ्यांबाबत अद्याप स्पष्ट निर्णय राज्य शासनाने घेतलेला नाही. त्यामुळे एकीकडे विद्यार्थी संभ्रमात असताना दुसरीकडे पालकही राज्य शासनाच्या भूमिकेविषयी नाराज आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता विद्यार्थ्यांना एकत्र बोलावून त्यांची ऑफलाईन परीक्षा या काळात घेणे अनेक शिक्षणतज्ज्ञांना धोक्याचे वाटते. त्यामुळे या वर्गातील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी परीक्षा घेणे तर महत्त्वाचे आहे; परंतु त्यासाठी काय पर्याय आहेत, याची पडताळणी सध्या शासनपातळीवर सुरू आहे. यातून ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी पुढे येत आहे; परंतु यासाठीची उपलब्ध साधनसामग्री अपुरी असणे, ग्रामीण भागातील इंटरनेट सेवेत येणारे अडथळे आदी कारणांमुळे ऑनलाईन परीक्षेची बाब अनेकांना योग्य वाटत नाही.

ठराविक कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेऊन, त्यांचे महाविद्यालय स्तरावर मूल्यांकन करून महाविद्यालयांमधून परीक्षा मंडळाला गुण पाठवणे, हा पर्याय होऊ शकतो. कारण विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना ‘नीट’सारख्या परीक्षांसाठी विशिष्ट पात्रतेची अट असते, सरसकट विद्यार्थी फक्त उत्तीर्ण केल्यास त्यांना या परीक्षा देता येणार नाहीत.

- प्रा. आरती बोबडे, शिक्षणतज्ज्ञ

सध्याच्या अडचणीच्या काळात गुणवत्तेपेक्षा विद्यार्थ्यांचे जीवन महत्त्वाचे आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेणेच योग्य राहणार आहे. कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बालकांनाच अधिक धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे कोरोनाला सर्वांनी गांभीर्याने घेतले पाहिजे.

- प्रा. सुनील तुरूकमाने, शिक्षणतज्ज्ञ

विद्यार्थांची एक तासाची बहुपर्यायी परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना गुणदान करता येईल. त्यामुळे विद्यार्थांचे योग्य गुणदान होऊन विद्यार्थांना पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच विद्यार्थ्यांचे दहावीचे गुण व महत्त्वाच्या विषयाचे वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापन याच्याआधारे विद्यार्थ्यांना गुणदान करता येईल.

- प्रा. गोविंद धोंडगे, शिक्षक

बारावी परीक्षा म्हणजे शैक्षणिक भविष्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. या परीक्षेला कोणताही अन्य पर्याय असूच शकत नाही. त्यामुळे राज्य शासनाने यासाठी आणखी काही पर्याय आहेत का, याची पडताळणी करणे आवश्यक आहे. परीक्षा रद्द करणे ही अत्यंत चुकीची बाब असणार आहे. त्यामुळे शासनाने परीक्षा घ्याव्यात.

- राधिका कडतन, विद्यार्थीनीतज्ज्ञ

विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षा होणे महत्त्वाचे आहे. बारावीच्या परीक्षेतील गुणांवरच भविष्यातील शिक्षण आणि नोकरीच्या अनेक संधी अवलंबून असतात. त्यामुळे शिक्षण विभागाने परीक्षा रद्द करण्याचा विचार करू नये. उलट या परीक्षा ऑनलाईन घेतल्या पाहिजेत. यासाठीची साधनसामग्री विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे.

- रोहित कटारे, विद्यार्थी

कोरोनाचा संसर्ग सध्या कमी झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून राज्य शासनाने बारावीतील विद्यार्थ्यांचे दहावी व अकरावीतील गुण विचारात घेऊन बारावीसाठी गुणदान करावे. याशिवाय सदरील विद्यार्थ्यांकडून यापूर्वीच्या शैक्षणिक सत्रात सक्रिय सहभाग नोंदविला गेल्यास त्यांना बोनस गुण दिले पाहिजेत.

- निकिता रोकडे, विद्यार्थिनी