शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
3
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
4
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
5
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
6
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
7
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
8
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
9
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
10
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
11
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
12
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
13
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
14
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
15
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

आठवडी बाजार बंद झाल्याने नुकसानीत भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:18 IST

वाळूची अवैध वाहतूक थांबेना परभणी : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक होत आहे. याविरुद्ध पोलीस प्रशासन कारवाई करीत ...

वाळूची अवैध वाहतूक थांबेना

परभणी : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक होत आहे. याविरुद्ध पोलीस प्रशासन कारवाई करीत असले तरी या वाहतुकीला अद्यापही लगाम लागलेला नाही. दररोेज जिल्ह्यात वाळूचे ट्रक पकडले जात आहेत. मात्र, ठोस मोठी कारवाई होत नाही. त्यामुळे वाळू माफियांचे मनोधैर्य उंचावत आहे. याशिवाय महसूल प्रशासनाचे नियंत्रण राहिले नसल्याने वाळू चोरी दिवसेंदिवस वाढत आहे.

बांधकाम साहित्याचा वाहतुकीला अडथळा

परभणी : शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रस्त्याच्या कडेला टाकलेल्या वाळूमुळे वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनपा प्रशासनाने कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

ग्रामीण रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था

परभणी : शहरातील ग्रामीण भागातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. मागील वर्षी अतिवृष्टीमध्ये रस्त्यांची वाताहात झाली होती. त्यानंतर आतापर्यंत रस्ते दुरुस्त केले नाहीत. ग्रामस्थांना मात्र दररोज याच मार्गावरून वाहतूक करावी लागत असल्याने हे रस्ते डोकेदुखी ठरत आहेत.

शहरातील बाजारपेठेत गर्दी

परभणी : शहरातील बाजारपेठ भागातील नागरिकांची गर्दी अजूनही कमी झालेली नाही. जिल्हा प्रशासनाने गर्दी कमी करण्याचे आवाहन केले असले तरी प्रत्यक्षात बाजारपेठेमध्ये येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढतच आहे. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत असताना शहरात याविरुद्ध कारवाई केली जात नाही.

नव्या वसाहतीत टंचाईच्या झळा

परभणी : शहरात नव्याने स्थापन झालेल्या वसाहतीमध्ये नळ योजनेचे पाणी पोहोचत नसल्याने या भागातील नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागली असून, भूजल पातळीत घट झाल्याने बोअर बंद पडले आहेत. त्यामुळे नव्या वसाहतींमधील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे.

रेल्वेस्थानकावर तपासणीला खो

परभणी : येथील रेल्वेस्थानकावरून दररोज हजारो नागरिक परभणी शहरात दाखल होत आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून स्थानकावर आरोग्य तपासणीला खो दिला आहे. मध्यंतरी रेल्वेस्थानकावर कोरोना तपासणी केंद्र सुरू केले होते; परंतु हे केंद्र आता बंद आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे काम रखडले

परभणी : परभणी ते मनमाड या रेल्वे मार्गावर दुहेरीकरणासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. परंतु केंद्र शासनाने या मार्गाच्या दुहेरीकरणास निधी उपलब्ध केला नाही. त्यामुळे हे काम ठप्प पडले आहे. अर्थसंकल्पाच्या सादरीकरणानंतर अनेकांनी दुहेरीकरण संदर्भात पाठपुरावा सुरू केला होता; परंतु आता हा पाठपुरावाही बंद झाला आहे.