शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

सव्वा दोन कोटींचा पाणीटंचाई आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:16 IST

जिंतूर : येथील पंचायत समितीच्यावतीने ५५ गावांमध्ये उपाययोजना करण्यासाठी प्रत्येकी ४ लाख रुपये याप्रमाणे दोन कोटी २४ लाख रुपयांचा ...

जिंतूर : येथील पंचायत समितीच्यावतीने ५५ गावांमध्ये उपाययोजना करण्यासाठी प्रत्येकी ४ लाख रुपये याप्रमाणे दोन कोटी २४ लाख रुपयांचा तात्पुरत्या पूरक पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला होता. या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

जिंतूर तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस होऊनही जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापासून ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागातर्फे टंचाईग्रस्त भागात योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भातील प्रस्तावित कामांची यादी प्रशासनाला सादर करण्यात आली होती. यामध्ये सुकळी, सुकळवाडी, हनवतखेडा, जांभरुन व वझर येथील नळ योजनांची विशेष दुरुस्ती करण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी प्रत्येकी ४ लाख रुपयांचा निधी लागणार आहे. तर उर्वरित ५० गावांमधून तात्पुरती पूरक योजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये नवहाती तांडा येथील तात्पुरत्या योजनेकरिता ८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून आसेगाव, आडगाव बाजार, आडगाव तांडा, बोरी तांडा, भोगाव, अंबिकावाडी, बामणी, चामणी, चारठाणा, वाघी धानोरा, गडदगव्हाण, देवसडी, मारवाडी, माथला, सावळी बु., बेलखेडा, येसेगाव, पिंपळगाव काजळे, पाचलेगाव पोखर्णी व तांडा, पिंपरी रोहिला, पुंगळा तांडा आदी गावांमध्ये प्रत्येकी ४ लाख रुपये खर्चाची तात्पुरती पुरक योजना राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. योजनांच्या या तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेसाठी आवश्यक असलेले परिपत्र सादर करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना कळविण्यात आले आहे. सद्यस्थितीत ५५ पैकी ५ ग्रामपंचायतींचे प्रपत्र प्राप्त झाले असल्याची माहिती उपअभियंता एस. एस. घुगे यांनी दिली.

योजना असूनही गावे तहानलेलीच

प्रस्तावित कामांच्या यादीपैकी बहुतांश गावांमध्ये शासनाच्या वेगवेगळ्या योजनेंतर्गत कायमस्वरुपी किमान २ ते ३ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या होत्या. परंतु, उन्हाळ्यात योजनेच्या जलस्त्रोतांची पाणीपातळी खोल जाणे, जलस्त्रोत कोरडे पडणे आदी कामांमध्ये त्रुटी व अन्य कारणांमुळे या गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

अनेक योजना अपूर्ण

गेल्या दोन वर्षांत तालुक्यात मुख्यमंत्री पेयजल व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनांपैकी वर्णा, वडाळी, असोला येथील योजना पूर्णत्वास आल्या आहेत. भोगाव येथील योजनेची किरकोळ कामे बाकी असून लिंबाळा येथे फक्त विहिरीचे काम पूर्ण झाले आहे. दुधगाव येथील वादग्रस्त योजनेचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तर मांडवा या आदिवासी गावातील योजनेचे ३० टक्के काम बाकी आहे. पिंपळगाव गायके येथील योजनेच्या विहिरीचे फक्त ५० टक्केच काम पूर्ण झाले आहे. किन्ही येथील योजना ९० टक्के पूर्ण झाल्याची माहिती या विभागाच्या कार्यालयाने दिली.