शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा दोन कोटींचा पाणीटंचाई आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:16 IST

जिंतूर : येथील पंचायत समितीच्यावतीने ५५ गावांमध्ये उपाययोजना करण्यासाठी प्रत्येकी ४ लाख रुपये याप्रमाणे दोन कोटी २४ लाख रुपयांचा ...

जिंतूर : येथील पंचायत समितीच्यावतीने ५५ गावांमध्ये उपाययोजना करण्यासाठी प्रत्येकी ४ लाख रुपये याप्रमाणे दोन कोटी २४ लाख रुपयांचा तात्पुरत्या पूरक पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला होता. या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

जिंतूर तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस होऊनही जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापासून ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागातर्फे टंचाईग्रस्त भागात योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भातील प्रस्तावित कामांची यादी प्रशासनाला सादर करण्यात आली होती. यामध्ये सुकळी, सुकळवाडी, हनवतखेडा, जांभरुन व वझर येथील नळ योजनांची विशेष दुरुस्ती करण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी प्रत्येकी ४ लाख रुपयांचा निधी लागणार आहे. तर उर्वरित ५० गावांमधून तात्पुरती पूरक योजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये नवहाती तांडा येथील तात्पुरत्या योजनेकरिता ८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून आसेगाव, आडगाव बाजार, आडगाव तांडा, बोरी तांडा, भोगाव, अंबिकावाडी, बामणी, चामणी, चारठाणा, वाघी धानोरा, गडदगव्हाण, देवसडी, मारवाडी, माथला, सावळी बु., बेलखेडा, येसेगाव, पिंपळगाव काजळे, पाचलेगाव पोखर्णी व तांडा, पिंपरी रोहिला, पुंगळा तांडा आदी गावांमध्ये प्रत्येकी ४ लाख रुपये खर्चाची तात्पुरती पुरक योजना राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. योजनांच्या या तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेसाठी आवश्यक असलेले परिपत्र सादर करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना कळविण्यात आले आहे. सद्यस्थितीत ५५ पैकी ५ ग्रामपंचायतींचे प्रपत्र प्राप्त झाले असल्याची माहिती उपअभियंता एस. एस. घुगे यांनी दिली.

योजना असूनही गावे तहानलेलीच

प्रस्तावित कामांच्या यादीपैकी बहुतांश गावांमध्ये शासनाच्या वेगवेगळ्या योजनेंतर्गत कायमस्वरुपी किमान २ ते ३ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या होत्या. परंतु, उन्हाळ्यात योजनेच्या जलस्त्रोतांची पाणीपातळी खोल जाणे, जलस्त्रोत कोरडे पडणे आदी कामांमध्ये त्रुटी व अन्य कारणांमुळे या गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

अनेक योजना अपूर्ण

गेल्या दोन वर्षांत तालुक्यात मुख्यमंत्री पेयजल व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनांपैकी वर्णा, वडाळी, असोला येथील योजना पूर्णत्वास आल्या आहेत. भोगाव येथील योजनेची किरकोळ कामे बाकी असून लिंबाळा येथे फक्त विहिरीचे काम पूर्ण झाले आहे. दुधगाव येथील वादग्रस्त योजनेचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तर मांडवा या आदिवासी गावातील योजनेचे ३० टक्के काम बाकी आहे. पिंपळगाव गायके येथील योजनेच्या विहिरीचे फक्त ५० टक्केच काम पूर्ण झाले आहे. किन्ही येथील योजना ९० टक्के पूर्ण झाल्याची माहिती या विभागाच्या कार्यालयाने दिली.