शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
2
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
3
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
4
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
5
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
6
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
7
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
8
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
9
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
10
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
11
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
12
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
13
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
14
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
15
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
16
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
17
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
18
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
19
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

जायकवाडी वगळता मराठवाड्यातील जलप्रकल्प कोरडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 19:52 IST

जायकवाडी वगळता इतर प्रकल्पांची स्थिती वाईट

ठळक मुद्देमराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा

- अनुराग पोवळेपरभणी :  संपूर्ण राज्यातील प्रकल्प ओसंडून वाहत असताना मराठवाड्यात जायकवाडी प्रकल्प वगळता इतर सर्वच मोठे प्रकल्प कोरडेठाक आहेत. परिणामी, मराठवाड्यात औरंगाबाद वगळता इतर जिल्ह्यांत पिण्याच्या पाण्याची चिंता अद्याप मिटलेली नाही.

आॅगस्टचा पहिला आठवडा संपला असला तरी मराठवाड्यात पावसाने दमदार हजेरी लावली नाही. विदर्भालगतच्या किनवट, माहूर, हदगाव या तालुक्यात पाऊस झाला आहे. परभणी जिल्ह्यातही आज घडीला २९ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २३०.२८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यात ३८९.४१ मि.मी.अर्थात सरासरीच्या ४० टक्के पाऊस झाला आहे. मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पात आज घडीला नाशिक जिल्ह्यातील धरणामधून पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. त्यामुळे मृतसाठ्यात गेलेल्या जायकवाडीत जवळपास १५  टक्के म्हणजेच जवळपास ३४० दलघमी पाणी उपलब्ध झाले आहे. पण त्याच वेळी बीड जिल्ह्यातील मोठा प्रकल्प असलेल्या माजलगाव प्रकल्पात ० टक्के जलसाठा आहे. 

परभणी जिल्ह्यातील ढालेगाव बंधारा, येलदरी, मुद्गल, मुळी, डिग्रस हे तर हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर प्रकल्पही कोरडाठाकच आहे. नांदेडच्या विष्णूपुरी बंधारा आजही मृतसाठ्यातच आहे. जिल्ह्यातील अंत्येश्वर, अप्पर मानार प्रकल्प हे ही कोरडेच आहेत. नांदेड जिल्ह्यात असलेल्या दोन मोठ्या प्रकल्पापैकी लोअर मानार प्रकल्पात १५ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. आमदुरा बंधाऱ्यात १२ दलघमी तर बळेगाव बंधाऱ्यात ६ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. तेलंगणाच्या सिमेवरील बहुचर्चेतील बाभळी बंधाराही कोरडाच आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या बंधाऱ्याचे संपूर्ण दरवाजे उघडे ठेवण्यात आले आहेत.पाण्याची परिस्थिती लक्षात घेता नांदेड जिल्हा प्रशासनाने पर्यायी उपाययोजनांना सुरुवात केली       आहे.त्याचवेळी परभणी जिल्हाधिकारी शिव शंकर यांनी सांगितले, आतापर्यंत जिल्ह्यात ३० टक्के पाऊस झाला. या पावसाने भूजल पातळी वाढण्यास मदत झाली आहे. पावसाचे दोन महिने उलटले असले तरी अद्याप दोन महिने शिल्लक आहे. या दोन महिन्यात पावसाची अपेक्षा आहे. त्याचवेळी जायकवाडी धरण भरत असल्याने परभणी जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी मार्गी लागला असल्याचे जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी  स्पष्ट केले. 

निजामसागरात ३ टक्के साठामराठवाड्यातील गोदावरी नदीवर असलेले बंधारे कोरडे असल्याने सीमावर्ती भागात असलेल्या तेलंगणा राज्यात असलेल्या निजामसागर प्रकल्पातही ३.६५ दलघमी जलसाठा उरला आहे.  याच भागातील पोचमपाड प्रकल्पात ८.३२ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे मराठवाड्यातील  प्रकल्पांप्रमाणेच तेलंगणातील प्रकल्पांचेही पाण्याअभावी हाल आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :DamधरणJayakwadi Damजायकवाडी धरणMarathwadaमराठवाडा