शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

जायकवाडीत येणार पाणी: परभणीत फटाके वाजवून जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:40 IST

मराठवाड्याच्या हक्काचे पाणी देण्यास विरोध करणारी याचिका फेटाळून लावत मराठवाड्याला पाणी सोडण्याचा निर्णय ३१ आॅक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयाचे परभणीत फटाके वाजवून स्वागत करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी देण्यास विरोध करणारी याचिका फेटाळून लावत मराठवाड्याला पाणी सोडण्याचा निर्णय ३१ आॅक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयाचे परभणीत फटाके वाजवून स्वागत करण्यात आले.जायकवाडी धरणाचे पाणी गोदावरी खोऱ्यातील उर्ध्व धरणात अडवून नगर, नाशिक जिल्ह्यातील साखर सम्राटांनी मराठवाड्याला पाणी देण्यासाठी विरोध केला होता. मोठ्या संघर्षानंतर समन्यायी पाणी वाटपचा कायदा २००५ मध्ये तत्कालीन शासनाला करावा लागला; परंतु, या कायद्यालाही न जुमानता पाणी अडविणे सुरुच ठेवले होते. या प्रकरणी मुंबईच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायलयाने मराठवाड्याच्या बाजुने आदेश दिले. त्यानुसार १५ आॅक्टोबर रोजी गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालक व नगर, नाशिकमधील पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी ७ टीएमसी पाण्याची तुट काढली. त्यानुसार ९ टीएमसी पाणी जायकवाडी प्रकल्पात सोडणे अपेक्षित असताना अधिकाºयांनी वेळखाऊ भूमिका घेतल्याने डॉ.पद्मश्री विठ्ठलराव विखे व संजीवनी साखर कारखान्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी केली. ३१ आॅक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका खारीज करुन मराठवाड्याच्या न्याय हक्काचे पाणी सोडण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर फटाके वाजवून निर्णयाचे स्वागत झाले. शेतकरी एकजुटीचा विजय असो, भारतीय न्याय व्यवस्थेचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी किसान सभेचे राज्य सहसचिव कॉ. विलास बाबर, अभिजीत जोशी, एकनाथराव साळवे, अनंतराव कच्छवे, अंकुश तवर, माणिक सूर्यवंशी, भूजंगराव धस, शिवाजी कच्छवे, किशन जगताप, भास्कर कच्छवे, गणेश बायस, सुरेश शिसोदे, बाजीराव सोगे, गणेश कच्छवे, ज्ञानोबा चंदेल, माणिकराव कच्छवे, गंगाधर जवंजाळ, नरसिंग कच्छवे आदी उपस्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयWaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरण