शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

सहा तासांनंतरही सर्वांपर्यंत पोहोचेना पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:15 IST

परभणी : नवीन पाणीपुरवठा योजना कार्यरत झाल्यानंतर काही भागात सहा तास पाणीपुरवठा करूनही सर्व घरांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याचा प्रकार ...

परभणी : नवीन पाणीपुरवठा योजना कार्यरत झाल्यानंतर काही भागात सहा तास पाणीपुरवठा करूनही सर्व घरांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे प्रभावतीनगर, सहकारनगर या भागातील नागरिकांची पाण्याची समस्या कायम आहे.

नवीन पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यानंतर या भागातील पाणी समस्या दूर होईल, अशी आशा निर्माण झाली होती. येथील प्रभाग क्रमांक १० मध्ये अनेक नागरिकांनी नवीन नळ योजनेवर जोडणी घेतली आहे. या अंतर्गत पाणीपुरवठाही सुरू झाला आहे. मात्र, प्रभावतीनगर, सहकारनगर या भागात चार महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे सहा- सहा तास पाणी सोडल्यानंतर हे पाणी सर्व घरांपर्यंत पोहोचत नाही. यासंदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला कळविण्यात आले. मनपाच्या अभियंत्यांनी तांत्रिक बिघाड दूर करण्याचा प्रयत्नही केला; परंतु त्यांना अद्यापपर्यंत बिघाड दुरुस्त करण्यात यश आले नाही. त्यामुळे प्रभावतीनगर, सहकारनगर या भागातील नागरिकांची पाण्याची समस्या कायम आहे. तेव्हा येथील नागरिकांना जुन्याच योजनेतून योग्य दाबाने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या संदर्भात नगरसेवक बाळासाहेब बुलबुले यांनी हा प्रश्न थेट विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मांडला आहे.