शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

कापसाच्या बियाण्यांसाठी एक तारखेपर्यंतची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:14 IST

खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेतकरी या हंगामाच्या तयारीला लागले आहेत. पेरणीसाठी लागणारे बियाणे, खताची मागणी वाढली आहे. संचारबंदीमुळे ...

खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेतकरी या हंगामाच्या तयारीला लागले आहेत. पेरणीसाठी लागणारे बियाणे, खताची मागणी वाढली आहे. संचारबंदीमुळे सध्या येथील बाजारपेठेत सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत उलाढाल होत आहे. जिल्हाभरातून शेतकरी बाजारपेठेत दाखल होत असले तरी खरेदी मात्र होत नाही. बाजारभावाची विचारपूस करून शेतकरी सध्या अंदाज घेत आहेत. जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी होते. ही बाब लक्षात घेता, दोन्ही बियाणांना मागणी आहे. मात्र मागील वर्षी कापसात बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला असल्याने या वर्षी १ जूनपर्यंत कापूस बियाण्यांच्या विक्रीसाठी परवानगी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाच्या बियाण्यांसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या तरी खताला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. १० ते १५ टक्के उलाढाल झाली असून, ही उलाढाल अधिक आहे.

मागील सहा महिन्यांपासून येथील मोंढा बाजारपेठ ठप्प आहे. मे महिन्यात बाजारपेठेतील उलाढाल वाढते. दरवर्षी मे महिन्यामध्ये खताच्या विक्रीतून मोठी उलाढाल होते; परंतु या वर्षी बाजारपेठेला वेळेचे बंधन असल्याने या उलाढालीवरही परिणाम झाला आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच शेतकरी बाजारात खरेदीसाठी मोठ्या संख्येने दाखल होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या तरी पावसाची प्रतीक्षा आहे.

तीस टक्क्यांनी वाढले सोयाबीनचे दर

मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी सोयाबीनचे दर ३० ते ४० टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव दराचा फटका सहन करावा लागणार आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीनला जास्तीत जास्त भाव मिळाल्याने सोयाबीन बियाणांचे भावही वाढले आहेत. या वर्षी सोयाबीन बियाणांचा बाजारपेठेत तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.