शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

४९८ गावकारभाऱ्यांसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:15 IST

परभणी : जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतींमध्ये आज, शुक्रवारी गावकारभारी निवडण्यासाठी मतदान होत आहे. ८ हजार ७१७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, ...

परभणी : जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतींमध्ये आज, शुक्रवारी गावकारभारी निवडण्यासाठी मतदान होत आहे. ८ हजार ७१७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, प्रशासनाने मतदानासाठी १ हजार ५७३ मतदान केंद्र स्थापन केली आहेत. गुरुवारी दिवसभर मतदानाची तयारी प्रशासनाने पूर्ण केली. सायंकाळच्या सुमारास अधिकारी-कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले आहेत.

मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भाग उमेदवारांच्या प्रचाराने ढवळून निघाला. जिल्ह्यात ५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ६७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता केवळ ४९८ ग्रामपंचायतींमध्येच मतदानाची प्रक्रिया राबविली जाणार आहे.

परभणी तालुक्यात ८८ ग्रामपंचायती असून, त्यातील नऊ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आता ७९ ग्रामपंचायतींमध्ये मतदान होत आहे. या मतदानाची तयारी करण्यासाठी गुरुवारी सकाळपासूनच येथील जायकवाडी परिसरातील कल्याण मंडपम्‌ येथे मतदानासाठी नियुक्त अधिकारी- कर्मचाऱ्यांना मतदान केंद्र निश्चित करून देण्यात आले. त्यानंतर दुपारच्या सुमारास हे अधिकारी-कर्मचारी मतदान यंत्रासह मतदान केंद्राकडे रवाना झाले. गुरुवारी सायंकाळीच मतदान केंद्र सज्ज ठेवले जाणार आहे. आज, शुक्रवारी आठ वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ होणार आहे. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालेल. ग्रामीण भागातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी पोलिसांनीही तगडा बंदोबस्त लावला आहे.

जिल्ह्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त

मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावला आहे. त्यात एक पोलीस उपअधीक्षक, ५ प्रभारी पोलीस उपअधीक्षक, १७ पोलीस निरीक्षक, ११६ सहायक पोलीस निरीक्षक, फौजदार, १२०० पोलीस कर्मचारी, अमरावती येथील १०० पोलीस कर्मचारी, औरंगाबाद येथील ३०० पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस कर्मचाऱ्यांची एक तुकडी, ७५० होमगार्ड असा बंदोबस्त लावला आहे.

संवेदनशील गावे

जिल्ह्यात मतदान होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींपैकी ८९ ग्रामपंचायती संवेदनशील आहेत. या संवेदनशील गावांमधील मतदान केंद्रांवर महसूल प्रशासनाने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी या ठिकाणी वाढीव बंदोबस्त लावला आहे. या गावांमध्ये शांततेत निवडणूक व्हावी, यासाठी यापूर्वीच पोलीस प्रशासनाने बैठका घेऊन आवाहन केले आहे.

मास्क, सॅनिटायझरचा वापर

कोरोनाच्या पार्श्वभूृमीवर सर्व ती काळजी प्रशासनाने घेतली आहे. मतदान केंद्रावर फिजिकल डिस्टन्स पाळत मतदारांची रांग लावली जाणार आहे. तसेच मतदानासाठी येताना मास्क वापरणे बंधनकारक आहे. सॅनिटायझरने हात स्वच्छ केल्यानंतरच मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

सोमवारी लागणार निकाल

आज, शुक्रवारी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर १८ जानेवारी रोजी प्रत्येक तालुक्यात मतमोजणी होणार आहे. साधारणत: दुपारी १२ वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे.