शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
5
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
6
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
7
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
8
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
9
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
10
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
11
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
12
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
13
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
14
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
15
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
16
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
17
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
18
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
19
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
20
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!

१८२ केंद्रांवरील लसीकरण ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:17 IST

परभणी : मागील आठ दिवसांपासून लसीचा पुरेसा साठा नसल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागत आहे. मंगळवारी तब्बल १८२ केंद्रांवरील ...

परभणी : मागील आठ दिवसांपासून लसीचा पुरेसा साठा नसल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागत आहे. मंगळवारी तब्बल १८२ केंद्रांवरील लसीकरण लसीअभावी ठप्प पडले होते.

कोरोनाच्या संसर्गापासून संरक्षण मिळवण्यासाठी लसीकरण महत्त्वपूर्ण आहे; परंतु मागच्या आठवडाभरापासून जिल्ह्यात लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यपातळीवर पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागत आहेत. राज्य शासनाने १ मेपासून १८ ते ४४ वर्षे या वयोगटातील नागरिकांना लसीकरण सुरू केले; परंतु काही दिवसातच हे लसीकरण बंद करावे लागले आहे. सध्या केवळ ४५ वर्षांपुढील नागरिकांसाठी लस दिली जात आहे. त्यातही जिल्ह्यात पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने ४५ वर्षांच्या पुढील दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांनाच प्राधान्य दिले जात आहे.

लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने २०५ केंद्रांवरून लसीकरण सुरू केले होते; परंतु लस उपलब्ध नसल्याने यातील बहुतांश केंद्र बंद ठेवावे लागत आहेत. १८ मे रोजी ६ प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयातील ८ आणि महानगरपालिकेच्या ९ केंद्रांवर लसीकरण सत्र राबविण्यात आले. उर्वरित १८२ केंद्र लसीअभावी बंद ठेवण्यात आले. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून, कोरोनापासून पूर्णतः संरक्षण देण्यासाठी लसीकरणावर भर देणे आवश्‍यक आहे; मात्र शासन आणि प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

२ लाख ३३ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण

जिल्ह्यात ४५ वर्षांपुढील नागरिकांची संख्या सुमारे ६ लाख एवढी असून, १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांची संख्याही ६ लाखांपर्यंत आहे. साधारणतः १२ लाख नागरिकांना लसीकरण करणे अपेक्षित असताना जिल्ह्याला आतापर्यंत केवळ २ लाख ४१ हजार लसीचे डोस प्राप्त झाले. त्यातून २ लाख ३३ हजार ३३१ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित नागरिकांना मात्र लसीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

३४ टक्के लसीकरण

४५ वर्षांपुढील वयोगटासाठीदेखील पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध नाही. त्यामुळे केवळ ३४ टक्के लसीकरण जिल्ह्यात पूर्ण झाले आहे. ४५ वर्षांपुढील १ लाख ७५ हजार ४६० नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यात १ लाख ४५ हजार ७९८ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, २९ हजार ६६२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

युवकांसाठी लस उपलब्ध नाही

जिल्ह्यात १८ ते ४४ या वयोगटासाठी सध्या लसीकरण बंद ठेवले आहे. या नागरिकांसाठी लस उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यात सध्या ४५ वर्षांपुढील नागरिकांनाच लसीकरण केले जात आहे.