शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्थानकात लालपरीचालकांची बेशिस्त; प्रवाशांना मनस्ताप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:22 IST

बसपोर्टच्या उभारणीसाठी येथील बसस्थानकाची इमारत जमीनदोस्त करण्यात आली असून, पत्र्याच्या शेडमध्ये स्थानकाचा कारभार चालविला जात आहे. चार ते पाच ...

बसपोर्टच्या उभारणीसाठी येथील बसस्थानकाची इमारत जमीनदोस्त करण्यात आली असून, पत्र्याच्या शेडमध्ये स्थानकाचा कारभार चालविला जात आहे. चार ते पाच बस उभ्या राहू शकतील, एवढीच जागा स्थानकात आहे. त्यामुळे बाहेरून आलेल्या बसेस स्थानकात आणताना आणि बाहेर नेताना चालकांना कसरत करावी लागते. जागेअभावी मनाला वाटेल तेथे बस उभ्या केल्या जातात. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. अनेक वेळा बस बाहेर काढताना वाहने आणि प्रवाशांच्या गर्दीतून बाहेर काढावी लागते. त्यामुळे बसस्थानकातील सध्याचा कारभार गोंधळाचा झाला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या परभणीत दररोज सुमारे २०० बसेच्या फेऱ्या होतात. मात्र अपुरी जागा असल्याने वाहन चालकांबरोबरच प्रवाशांनाही कसरत करावी लागते. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

सुविधाही मिळत नसल्याने मनस्ताप

परभणी बसस्थानकावर प्रवाशांना पुरेशा सुविधादेखील उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांना एखाद्या खेडेगावातील बस थांब्यावर थांबल्याचा अनुभव परभणीतील स्थानकावर येत आहे.

प्रवाशांसाठी तात्पुरता पत्र्याचा शेड उभारण्यात आला. परंतु, या शेडमध्ये दुपारी १२ वाजेपासून ते सूर्य मावळेपर्यंत कायमस्वरूपी ऊन येते. त्यामुळे प्रवासी शेडमध्ये थांबण्याचे टाळतात. एखाद्या बसचाच सावलीसाठी आधार घ्यावा लागतो.

पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह या सुविधाही उपलब्ध नाहीत. शिवाय स्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. त्यामुळे चिखल तुडवतच बस गाठावी लागते.

येथील बसस्थानकात बस उभी करण्यासाठीही पुरेशी जागा नाही. त्यामुळे प्रवाशांना त्यांची इच्छित बस गाठण्यासाठी स्थानकावर आल्यापासून सतर्क रहावे लागते. उभे राहूनच बसची प्रतीक्षा करावी लागत असल्याने प्रवासी त्रस्त आहेत.

-विष्णू जाधव, प्रवासी

परभणी बसस्थानकावर बसेस थांबवण्यासाठी फलाटांची निर्मिती केली नाही.त्यामुळे कोणत्या गावची बस कोठे उभी राहील, याचा नेम नाही. मागील सहा महिन्यांपासून अशी परिस्थिती निर्माण झाल्याने प्रवाशांची तारांबळ होत आहे.

-यशवंत कुलकर्णी, प्रवासी

बसपोर्टच्या कामामुळे गैरसोय वाढली

शहरातील बसस्थानकावर अद्ययावत असे बसपोर्ट उभारणीचे काम सुरू झाले आहे. हे काम सध्या संथगतीने होत आहे. बसपोर्टच्या कामासाठी पर्यायी स्वरूपात बसस्थानकाचा कारभार चालविला जात आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय वाढली आहे.