शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

स्थानकात लालपरीचालकांची बेशिस्त; प्रवाशांना मनस्ताप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:22 IST

बसपोर्टच्या उभारणीसाठी येथील बसस्थानकाची इमारत जमीनदोस्त करण्यात आली असून, पत्र्याच्या शेडमध्ये स्थानकाचा कारभार चालविला जात आहे. चार ते पाच ...

बसपोर्टच्या उभारणीसाठी येथील बसस्थानकाची इमारत जमीनदोस्त करण्यात आली असून, पत्र्याच्या शेडमध्ये स्थानकाचा कारभार चालविला जात आहे. चार ते पाच बस उभ्या राहू शकतील, एवढीच जागा स्थानकात आहे. त्यामुळे बाहेरून आलेल्या बसेस स्थानकात आणताना आणि बाहेर नेताना चालकांना कसरत करावी लागते. जागेअभावी मनाला वाटेल तेथे बस उभ्या केल्या जातात. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. अनेक वेळा बस बाहेर काढताना वाहने आणि प्रवाशांच्या गर्दीतून बाहेर काढावी लागते. त्यामुळे बसस्थानकातील सध्याचा कारभार गोंधळाचा झाला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या परभणीत दररोज सुमारे २०० बसेच्या फेऱ्या होतात. मात्र अपुरी जागा असल्याने वाहन चालकांबरोबरच प्रवाशांनाही कसरत करावी लागते. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

सुविधाही मिळत नसल्याने मनस्ताप

परभणी बसस्थानकावर प्रवाशांना पुरेशा सुविधादेखील उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांना एखाद्या खेडेगावातील बस थांब्यावर थांबल्याचा अनुभव परभणीतील स्थानकावर येत आहे.

प्रवाशांसाठी तात्पुरता पत्र्याचा शेड उभारण्यात आला. परंतु, या शेडमध्ये दुपारी १२ वाजेपासून ते सूर्य मावळेपर्यंत कायमस्वरूपी ऊन येते. त्यामुळे प्रवासी शेडमध्ये थांबण्याचे टाळतात. एखाद्या बसचाच सावलीसाठी आधार घ्यावा लागतो.

पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह या सुविधाही उपलब्ध नाहीत. शिवाय स्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. त्यामुळे चिखल तुडवतच बस गाठावी लागते.

येथील बसस्थानकात बस उभी करण्यासाठीही पुरेशी जागा नाही. त्यामुळे प्रवाशांना त्यांची इच्छित बस गाठण्यासाठी स्थानकावर आल्यापासून सतर्क रहावे लागते. उभे राहूनच बसची प्रतीक्षा करावी लागत असल्याने प्रवासी त्रस्त आहेत.

-विष्णू जाधव, प्रवासी

परभणी बसस्थानकावर बसेस थांबवण्यासाठी फलाटांची निर्मिती केली नाही.त्यामुळे कोणत्या गावची बस कोठे उभी राहील, याचा नेम नाही. मागील सहा महिन्यांपासून अशी परिस्थिती निर्माण झाल्याने प्रवाशांची तारांबळ होत आहे.

-यशवंत कुलकर्णी, प्रवासी

बसपोर्टच्या कामामुळे गैरसोय वाढली

शहरातील बसस्थानकावर अद्ययावत असे बसपोर्ट उभारणीचे काम सुरू झाले आहे. हे काम सध्या संथगतीने होत आहे. बसपोर्टच्या कामासाठी पर्यायी स्वरूपात बसस्थानकाचा कारभार चालविला जात आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय वाढली आहे.