शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
2
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
3
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
4
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
5
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
6
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
7
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
8
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
9
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
10
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
11
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
13
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...
14
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या
15
Manoj Jarange Patil: "माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू"
16
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची आवडती कार, मोदींनीही केली सफर! 'लाल झेंडा' असलेल्या 'या' गाडीत खास काय?
17
भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
18
GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या
19
'आरक्षण बचाव'ची मागणी, मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण
20
Mumbai Local: मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

स्थानकात लालपरीचालकांची बेशिस्त; प्रवाशांना मनस्ताप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:22 IST

बसपोर्टच्या उभारणीसाठी येथील बसस्थानकाची इमारत जमीनदोस्त करण्यात आली असून, पत्र्याच्या शेडमध्ये स्थानकाचा कारभार चालविला जात आहे. चार ते पाच ...

बसपोर्टच्या उभारणीसाठी येथील बसस्थानकाची इमारत जमीनदोस्त करण्यात आली असून, पत्र्याच्या शेडमध्ये स्थानकाचा कारभार चालविला जात आहे. चार ते पाच बस उभ्या राहू शकतील, एवढीच जागा स्थानकात आहे. त्यामुळे बाहेरून आलेल्या बसेस स्थानकात आणताना आणि बाहेर नेताना चालकांना कसरत करावी लागते. जागेअभावी मनाला वाटेल तेथे बस उभ्या केल्या जातात. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. अनेक वेळा बस बाहेर काढताना वाहने आणि प्रवाशांच्या गर्दीतून बाहेर काढावी लागते. त्यामुळे बसस्थानकातील सध्याचा कारभार गोंधळाचा झाला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या परभणीत दररोज सुमारे २०० बसेच्या फेऱ्या होतात. मात्र अपुरी जागा असल्याने वाहन चालकांबरोबरच प्रवाशांनाही कसरत करावी लागते. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

सुविधाही मिळत नसल्याने मनस्ताप

परभणी बसस्थानकावर प्रवाशांना पुरेशा सुविधादेखील उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांना एखाद्या खेडेगावातील बस थांब्यावर थांबल्याचा अनुभव परभणीतील स्थानकावर येत आहे.

प्रवाशांसाठी तात्पुरता पत्र्याचा शेड उभारण्यात आला. परंतु, या शेडमध्ये दुपारी १२ वाजेपासून ते सूर्य मावळेपर्यंत कायमस्वरूपी ऊन येते. त्यामुळे प्रवासी शेडमध्ये थांबण्याचे टाळतात. एखाद्या बसचाच सावलीसाठी आधार घ्यावा लागतो.

पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह या सुविधाही उपलब्ध नाहीत. शिवाय स्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. त्यामुळे चिखल तुडवतच बस गाठावी लागते.

येथील बसस्थानकात बस उभी करण्यासाठीही पुरेशी जागा नाही. त्यामुळे प्रवाशांना त्यांची इच्छित बस गाठण्यासाठी स्थानकावर आल्यापासून सतर्क रहावे लागते. उभे राहूनच बसची प्रतीक्षा करावी लागत असल्याने प्रवासी त्रस्त आहेत.

-विष्णू जाधव, प्रवासी

परभणी बसस्थानकावर बसेस थांबवण्यासाठी फलाटांची निर्मिती केली नाही.त्यामुळे कोणत्या गावची बस कोठे उभी राहील, याचा नेम नाही. मागील सहा महिन्यांपासून अशी परिस्थिती निर्माण झाल्याने प्रवाशांची तारांबळ होत आहे.

-यशवंत कुलकर्णी, प्रवासी

बसपोर्टच्या कामामुळे गैरसोय वाढली

शहरातील बसस्थानकावर अद्ययावत असे बसपोर्ट उभारणीचे काम सुरू झाले आहे. हे काम सध्या संथगतीने होत आहे. बसपोर्टच्या कामासाठी पर्यायी स्वरूपात बसस्थानकाचा कारभार चालविला जात आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय वाढली आहे.