शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

पंधरा दिवसांत दोन खून, पोलिसांवरही दगडफेक; परभणी जिल्ह्यात गुन्हेगारांचे धारिष्ट वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 12:11 IST

अवैध धंद्यांना विरोध करणाऱ्या युवकाचा खून आणि अवैध धंदे बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच दगडफेक केल्याच्या या घटनांनी जिल्ह्यात गुन्हेगारांचे धारिष्ट वाढले काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.

परभणी : अवैध वाळू उपशाला विरोध करणाऱ्या युवकास संपविण्याच्या घटनेबरोबरच अवैध धंदे बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच दगडफेक करण्याच्या घटनेने जिल्ह्यात गुन्हेगारांचे धारिष्ट वाढले की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. खून, मारहाण, जबरी चोरी यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचाच प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात गोदावरी, पूर्णा आणि दुधना या नद्यांचे विस्तीर्ण पात्र असल्याने वाळूचा गोरखधंदा येथे मोठ्या प्रमाणात चालतो. अवैध वाळू उपशाला विरोध केल्याने पालम तालुक्यातील रावराजूर येथे वाळूमाफियांनी गावातीलच माधव शिंदे याला बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना २५ मार्च रोजी घडली. या प्रकरणात अजूनही पाच आरोपी फरार आहेत.

पोलिसांवरच दगडफेकऊसतोड कामगाराचा खून करून त्याला पालम तालुक्यातील फळा येथे आणून टाकल्याची घटना २७ मार्च रोजी घडली. या प्रकरणातही एक आरोपी फरार आहे, तर सेलू तालुक्यातील लाडनांदरा येथे अवैध धंदे बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत पोलीस निरीक्षकासह अन्य चार कर्मचारी जखमी झाले होते. अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत वाद घातल्याचे प्रकारही जिल्ह्यात घडले आहेत. यशिवाय अवैध दारूविक्री, जुगार, घरफोड्यांच्या घटनाही सातत्याने घडत आहेत. अवैध धंद्यांना विरोध करणाऱ्या युवकाचा खून आणि अवैध धंदे बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच दगडफेक केल्याच्या या घटनांनी जिल्ह्यात गुन्हेगारांचे धारिष्ट वाढले काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. पोलिसांवरच जर हल्ले होत असतील तर सर्वसामान्यांचे काय? अशी भावना नागरिकांत निर्माण झाली असून, असुरक्षितता वाढत आहे. या सर्व घटनांमधून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी