शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

पंधरा दिवसांत दोन खून, पोलिसांवरही दगडफेक; परभणी जिल्ह्यात गुन्हेगारांचे धारिष्ट वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 12:11 IST

अवैध धंद्यांना विरोध करणाऱ्या युवकाचा खून आणि अवैध धंदे बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच दगडफेक केल्याच्या या घटनांनी जिल्ह्यात गुन्हेगारांचे धारिष्ट वाढले काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.

परभणी : अवैध वाळू उपशाला विरोध करणाऱ्या युवकास संपविण्याच्या घटनेबरोबरच अवैध धंदे बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच दगडफेक करण्याच्या घटनेने जिल्ह्यात गुन्हेगारांचे धारिष्ट वाढले की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. खून, मारहाण, जबरी चोरी यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचाच प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात गोदावरी, पूर्णा आणि दुधना या नद्यांचे विस्तीर्ण पात्र असल्याने वाळूचा गोरखधंदा येथे मोठ्या प्रमाणात चालतो. अवैध वाळू उपशाला विरोध केल्याने पालम तालुक्यातील रावराजूर येथे वाळूमाफियांनी गावातीलच माधव शिंदे याला बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना २५ मार्च रोजी घडली. या प्रकरणात अजूनही पाच आरोपी फरार आहेत.

पोलिसांवरच दगडफेकऊसतोड कामगाराचा खून करून त्याला पालम तालुक्यातील फळा येथे आणून टाकल्याची घटना २७ मार्च रोजी घडली. या प्रकरणातही एक आरोपी फरार आहे, तर सेलू तालुक्यातील लाडनांदरा येथे अवैध धंदे बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत पोलीस निरीक्षकासह अन्य चार कर्मचारी जखमी झाले होते. अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत वाद घातल्याचे प्रकारही जिल्ह्यात घडले आहेत. यशिवाय अवैध दारूविक्री, जुगार, घरफोड्यांच्या घटनाही सातत्याने घडत आहेत. अवैध धंद्यांना विरोध करणाऱ्या युवकाचा खून आणि अवैध धंदे बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच दगडफेक केल्याच्या या घटनांनी जिल्ह्यात गुन्हेगारांचे धारिष्ट वाढले काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. पोलिसांवरच जर हल्ले होत असतील तर सर्वसामान्यांचे काय? अशी भावना नागरिकांत निर्माण झाली असून, असुरक्षितता वाढत आहे. या सर्व घटनांमधून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी