शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

सरपण आणणे बेतले जीवावर; करपरा धरणात मातेसह दोन बालकांचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 18:09 IST

जिंतूर तालुक्यातील निवळी येथील घटना, पाण्याचा अंदाज न आल्याचे बुडाल्याची चर्चा

- तुकाराम सर्जेबोरी (जि.परभणी) : सरपण आणण्यासाठी ३० वर्षीय महिला दोन बालकांसह जिंतूर तालुक्यातील निवळी येथील करपरा धरण परिसरात मंगळवारी सकाळी १० वाजता गेली होती. यानंतर सायंकाळी ५.३० च्या सुमारास दोन बालकांचे मृतदेह या धरणाच्या पाण्यावर तरंगताना आढळून आली होती. तर आज सकाळी महिलेचा मृतदेह धरणात सापडल्याने खळबळ उडाली आहे. 

निवळी बुद्रुक येथील नसरीन रसूल पठाण (३०), आयान रसूल पठाण (तीन वर्ष), सना रसूल पठाण (वय दीड वर्ष) अशी मयतांची नावे आहेत. जिंतूर तालुक्यातील निवळी येथील नसरीन रसूल पठाण या सरपण आणण्यासाठी करपरा धरण परिसरात मंगळवारी सकाळी दोन बालकांसह गेल्या होत्या. तहान लागल्यामुळे धरणकाठी पाणी आणण्यासाठी त्या बालकांना घेऊन गेल्या असता त्यांचा तोल गेल्याने निवळी धरणामध्ये त्या बुडाल्याचा संशय मंगळवारी दुपारी काही जणांना आला. 

दरम्यान, त्यानंतर बोरी पोलिस व ग्रामस्थांच्या मदतीने शोध कार्य सुरू झाले. मंगळवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास दोन चिमुकले या पाण्यात तरंगताना आढळून आले. मात्र, महिला बेपत्ता असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत शोध कार्य चालू होते. परंतू, अंधारामुळे शोधकार्य थांबले. यानंंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा शोध कार्य सुरू केले असता बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास जलाशयातील पाण्यामध्ये नसरीन रसूल पठाण या देखील मृत अवस्थेत आढळून आल्या. या घटनेत सना रसूल पठाण (वय दिड) आयान रसूल पठाण (वय तीन) या बालकांचा व महिलेचा मृत्यू झाला.

११ वर्षीय मुलीचा वाचला जीवदरम्यान, ११ वर्षीय मुलगी शाळेत गेली होती म्हणून तिचा जीव वाचला, अशी चर्चा येथे सुरु होती. घटनास्थळी बोरी पोलिसांनी पंचनामा केला असून मृतकाचे शवविच्छेदन बोरीच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. बोरी ठाण्यामध्ये शेख महबूब शेख दादामिया (रा.जिंतूर) यांच्या माहितीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सपोनि.वसंत मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे, के.जी.पतंगे, तूपसुंदर हे करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू