शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

विद्युत वाहिन्यांच्या घर्षणातून ठिणगी पडल्याने दोन एकर ऊस जळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 13:21 IST

शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून दुष्काळात आर्थिक संकट ओढवले आहे. 

पालम (परभणी ) : तालुक्यातील आरखेड शिवारात वीजतारा एकमेकांना स्पर्श होऊन दोन एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी (दि.28) सकाळी नऊ वाजता घडली. यामुळे शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून दुष्काळात आर्थिक संकट ओढवले आहे. 

आरखेड शिवारात सखाराम नरहरी दुधाटे व दत्ता सखाराम दुधाटे यांच्या कुटुंबाची शेतजमीन आहे. या शेतजमिनीमध्ये दोन एकरात त्यांनी उसाची लागवड केली होती. ऊसावर खत व मशागतीसाठी त्यांनी लाखो रुपयांचा खर्च केला. तसेच दुष्काळ असतानाही विकतचे पाणी घेऊन पिक जगवले.  आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेतातून लोंबकळत गेलेल्या विद्युत वाहिन्यांचा एकमेकांना स्पर्श होऊन ठिणगी पडली. शेतातील पाचट यामुळे पेटली, काही वेळातच आग संपूर्ण शेतात पसरली. ऊस जळल्याने शेतकऱ्याचे जवळपास २ लाखांचे नुकसान झाले आहे. दुष्काळात मेहनत पूर्वक पोसलेले पिक हातचे गेल्याने शेतकरी व्यथित झाले आहेत. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षाने हे संकट ओढवले असल्याचा आरोप करत  तातडीने उसाचा पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :fireआगparabhaniपरभणीFarmerशेतकरी