शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
2
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
3
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
4
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
5
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
6
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
7
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
8
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
11
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
12
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
13
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
14
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
15
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
16
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
17
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
18
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
19
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!

जलाशयातील अवैध पाणी उपसा बंद करा; परभणी जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 16:35 IST

जिल्ह्यातील प्रकल्पांमधून होत असलेला अवैध पाणी उपसा बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी अधिकार्‍यांना दिले आहेत. 

ठळक मुद्देयावर्षी जिल्ह्यात केवळ ६९.१४ टक्के पाऊस झाला आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या जलाशयात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही.पाऊस कमी झाल्याने उन्हाळ्यात भेडसावणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पाटबंधारे प्रकल्पातील पाणी ग्रामीण व शहरी भागातील पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आले. आरक्षित केलेल्या पाण्याची निगराणी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी करावी, या पाण्याचा अवैध उपसा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

परभणी : जिल्ह्यातील प्रकल्पांमधून होत असलेला अवैध पाणी उपसा बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी अधिकार्‍यांना दिले आहेत. 

यावर्षी जिल्ह्यात केवळ ६९.१४ टक्के पाऊस झाला आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या जलाशयात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. विशेषत: पालम, जिंतूर, पाथरी, गंगाखेड या तालुक्यातील प्रकल्पांची परिस्थिती गंभीर आहे. पाऊस कमी झाल्याने उन्हाळ्यात भेडसावणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पाटबंधारे प्रकल्पातील पाणी ग्रामीण व शहरी भागातील पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आले. त्यामुळे आरक्षित केलेल्या पाण्याची निगराणी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी करावी, या पाण्याचा अवैध उपसा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

सद्यस्थितीत प्रकल्पातील पाण्याचा अवैध उपसा होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे आगामी काळात टंचाईचे संकट आणखी गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रकल्पातील पाणीसाठा संपला तर परिसरातील विहिरी व बोअरच्या पाणीपातळीवरही परिणाम होईल. या सर्व बाबी लक्षात घेता प्रकल्पातील पाणीसाठा जास्तीत जास्त कालावधीपर्यंत वापरता यावा, या दृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

पाणीसाठ्यात झपाट्याने घटपाटबंधारे विभागाने दिलेल्या १५ आॅक्टोबर २०१७ आणि २८ डिसेंबर २०१७ या दोन अहवालात पाणीसाठ्यातील फरक जिल्हाधिकार्‍यांनी तपासला. तेव्हा साठ्यात झपाट्याने घट झाल्याचे दिसून आले आहे. जलाशयातील पाण्याचा विद्युत मोटारीद्वारे सिंचनासाठी वापर होत असल्याच्या तक्रारी देखील प्राप्त झाल्या आहेत. तेव्हा प्रकल्पाच्या जलाशयातील अवैध उपसा थांबविण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पथक गठित करावे, असे निर्देशही जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. 

असे राहील पथकप्रकल्प परिसरातील विद्युत मोटारी जप्त करणे, विद्युत कनेक्शन तोडणे, अवैध वीज वापरणार्‍यांवर कारवाई करणे आणि अवैध पाणी उपसा थांबविण्याची कामे करण्यासाठी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकात तहसीलदार हे पथक प्रमुख असून संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, वीज कंपनीचे अभियंता  हे सदस्य म्हणून काम पाहतील तर पाटबंधारे विभागाचे अधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. 

टॅग्स :Waterपाणीwater transportजलवाहतूकparabhaniपरभणीcollectorजिल्हाधिकारी