शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

धावत्या बसचे टायर पडले गळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:14 IST

परभणी : धावत्या बसचे टायर अचानक गळून पडल्याची घटना तालुक्यातील कुंभारी-आर्वी मार्गावर १९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ...

परभणी : धावत्या बसचे टायर अचानक गळून पडल्याची घटना तालुक्यातील कुंभारी-आर्वी मार्गावर १९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. बसमध्ये एकही प्रवासी नसल्याने अनर्थ टळला.

परभणी आगारातून ग्रामीण भागासाठी खिळखिळ्या झालेल्या बसेस सोडल्या जातात. प्रवाशांनी अनेक वेळा तक्रार केल्यानंतरही महामंडळाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या बसला केव्हाही अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून, प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

सोमवारी परभणी-कुंभारी (एम एच ०६/एस ८६४७) ही बस परभणी येथून प्रवासी घेऊन निघाली. कुंभारी येथे सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बस पोहोचली. बसमधील प्रवासी खाली उतरले आणि रिकामी बस घेऊन चालक-वाहक परभणीकडे निघाले. मात्र कुंभारीपासून काही अंतरावर कुंभारी-आर्वी या रस्त्यावर धावत्या बसचे टायर अचानक निखळले. त्यामुळे काही अंतरापर्यंत बस घसरत पुढे जाऊन उभी राहिली. या बसमध्ये एकही प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. परंतु या घटनेने परभणी आगाराचा निष्काळजीपणा समोर आला आहे.