शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

विदारक ! नदीवर पूल नसल्याने रुग्णवाहिका थांबली, अखेर बैलगाडीतून नेला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2021 12:02 IST

सेलू तालुक्यातील नरसापुर येथील करपरा नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांचे हाल

ठळक मुद्देअनेक पिढ्यांची जीवघेणी कसरत सुरूच

देवगावफाटा (परभणी ) : पावसाळ्यात करपरा नदीला पूर आला की नरसापुरचा दहादहा दिवस संपर्क तुटतो. १८ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथून एका रुग्णवाहिकेतून आणलेला मृतदेह पूल नसल्याने थेट गावात नेता आला नाही. शेवटी बैलगाडीतून मृतदेह नदीतून न्यावा लागला. अनेकदा तर लेकरा-बाळांना डोक्यावर घेऊन कंबरे इतक्या पाण्यातून नदीपार करावी लागते. येथील अनेक पिढ्यांनी नेते व अधिकाऱ्यांच्या हातापाया पडल्यानंतरही आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही अशा व्यथा ग्रामस्थानी मांडल्या.

सेलू तालुक्यातील ५६०  लोकवस्तीचे नरसापुर हे गाव आहे. एका बाजुला तलाव तर तिन्ही बाजुने करपरा नदीचा वेढा आहे. नरसापुर ते बोरकीनी रस्त्यावर ही नदी आडवी येते. येथील भिमराव उकंडी शेळके यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह १८ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथून रुग्णवाहिकेतून गावाकडे आणण्यात आला. मात्र, करपरा नदीला कंबरेइतके पाणी असल्याने रुग्णवाहिका पुढे गेली नाही. शेवटी मृतदेह बैलगाडीद्वारे नदीपार करून गावात आणण्यात आला. 

पूल नसल्याने पूर किंवा पाणी वाढले की येणे - जाणे बंद होते. कधीकधी तर १५  दिवस अनेक गावांचा संपर्क तुटतो. ग्रामस्थांनी अनेकदा पूल उभारणीची मागणी केली. परंतु, आश्वासन व सर्वेक्षण यापुढे काहीच झाले नाही. प्रशासन व लोकप्रतिनिधी पूल उभारणीसाठी प्राधान्याने प्रयत्न करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामस्थांचे हाल आणि अतोनात नुकसान पाऊस आला की,गावचा संपर्क तुटतो. पावसाळ्यात दोन दोन महिने सायकल, दुचाकीदेखील नेता येत नाही. शेतकऱ्यांच्या शेतीमालाची वाहतूक करता येत नाही. गावातील दूध उत्पादकांना दुध डोक्यावर न्यावे लागते. ७५ वर्षापासूनचा हा प्रश्न कधी सुटणार.- प्रसाद जावळे, ग्रामस्थ, नरसापुर

या पूर्वीच्या घटना : - यापूर्वी ११ आँक्टोबर २०२० रोजी येथील युवकाला सर्पदंश झाल्याने करपरा नदिच्या पुरातून नेतांना १४ यूवकांना आर्धातास कसरत करावी लागली त्यानंतर जालना येथे उपचार घेऊन हा युवक बरा झाला होता.- २२ जुलै २०२१ रोजी ही बोरकीनी येथील शेतकरी अर्जून मुसळे हे या नदिच्या पुरात वाहुन जात असतांना ४ युवकांनी दोरखंड च्या सहाय्याने त्यांना बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले होते.

टॅग्स :parabhaniपरभणीriverनदी