शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
4
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
5
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
6
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
7
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
8
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
9
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
10
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
12
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
13
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
15
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
16
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
17
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
19
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
20
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले

विदारक ! नदीवर पूल नसल्याने रुग्णवाहिका थांबली, अखेर बैलगाडीतून नेला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2021 12:02 IST

सेलू तालुक्यातील नरसापुर येथील करपरा नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांचे हाल

ठळक मुद्देअनेक पिढ्यांची जीवघेणी कसरत सुरूच

देवगावफाटा (परभणी ) : पावसाळ्यात करपरा नदीला पूर आला की नरसापुरचा दहादहा दिवस संपर्क तुटतो. १८ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथून एका रुग्णवाहिकेतून आणलेला मृतदेह पूल नसल्याने थेट गावात नेता आला नाही. शेवटी बैलगाडीतून मृतदेह नदीतून न्यावा लागला. अनेकदा तर लेकरा-बाळांना डोक्यावर घेऊन कंबरे इतक्या पाण्यातून नदीपार करावी लागते. येथील अनेक पिढ्यांनी नेते व अधिकाऱ्यांच्या हातापाया पडल्यानंतरही आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही अशा व्यथा ग्रामस्थानी मांडल्या.

सेलू तालुक्यातील ५६०  लोकवस्तीचे नरसापुर हे गाव आहे. एका बाजुला तलाव तर तिन्ही बाजुने करपरा नदीचा वेढा आहे. नरसापुर ते बोरकीनी रस्त्यावर ही नदी आडवी येते. येथील भिमराव उकंडी शेळके यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह १८ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथून रुग्णवाहिकेतून गावाकडे आणण्यात आला. मात्र, करपरा नदीला कंबरेइतके पाणी असल्याने रुग्णवाहिका पुढे गेली नाही. शेवटी मृतदेह बैलगाडीद्वारे नदीपार करून गावात आणण्यात आला. 

पूल नसल्याने पूर किंवा पाणी वाढले की येणे - जाणे बंद होते. कधीकधी तर १५  दिवस अनेक गावांचा संपर्क तुटतो. ग्रामस्थांनी अनेकदा पूल उभारणीची मागणी केली. परंतु, आश्वासन व सर्वेक्षण यापुढे काहीच झाले नाही. प्रशासन व लोकप्रतिनिधी पूल उभारणीसाठी प्राधान्याने प्रयत्न करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामस्थांचे हाल आणि अतोनात नुकसान पाऊस आला की,गावचा संपर्क तुटतो. पावसाळ्यात दोन दोन महिने सायकल, दुचाकीदेखील नेता येत नाही. शेतकऱ्यांच्या शेतीमालाची वाहतूक करता येत नाही. गावातील दूध उत्पादकांना दुध डोक्यावर न्यावे लागते. ७५ वर्षापासूनचा हा प्रश्न कधी सुटणार.- प्रसाद जावळे, ग्रामस्थ, नरसापुर

या पूर्वीच्या घटना : - यापूर्वी ११ आँक्टोबर २०२० रोजी येथील युवकाला सर्पदंश झाल्याने करपरा नदिच्या पुरातून नेतांना १४ यूवकांना आर्धातास कसरत करावी लागली त्यानंतर जालना येथे उपचार घेऊन हा युवक बरा झाला होता.- २२ जुलै २०२१ रोजी ही बोरकीनी येथील शेतकरी अर्जून मुसळे हे या नदिच्या पुरात वाहुन जात असतांना ४ युवकांनी दोरखंड च्या सहाय्याने त्यांना बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले होते.

टॅग्स :parabhaniपरभणीriverनदी