शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

डोंगरांवर एकात्मिक वृक्ष लागवड करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 18:03 IST

कमी पाण्यात, कमी जागेत आणि लवकर वाढणारी पारंपारिक झाडे लावण्यावर नागरिकांनी भर दिला पाहिजे़

- प्रसाद आर्वीकर

पावसाळा आला की वृक्ष लागवड  मोहिमा सुरू होतात़ मात्र ही झाडे टिकत नाहीत आणि पूर्वीसारखीच परिस्थिती पुन्हा निर्माण होते़ तेव्हा वृक्ष लागवड करताना काय काळजी, कोणती झाडे कोणत्या ठिकाणी लावावीत आणि पर्यावरण संवर्धनासाठी नेमक्या कशा पद्धतीने वृक्षारोपण करावे, याविषयी येथील तज्ज्ञ प्रा. डॉ. सुनील मोडक यांच्याशी साधलेला संवाद... 

वृक्षारोपण करण्यासाठी कोणत्या जागा निवडाव्यात?वृक्षारोपण करण्यासाठी शक्य तो शासकीय मोकळ्या जागा, माळरान आणि डोंगरी भाग निवडला पाहिजे़ आपल्या भागात येणारी खैर, बाभूळ, पळस, बिबा, विलायती चिंच, कोंदन, वड, पिंपळ, फणस ही झाडे लावण्यास प्राधान्य द्यावे़ शहराबाहेर रस्त्याच्याकडेला मोठी उंच वाढणारी झाडे लावावीत़ 

कशा पद्धतीने वृक्षारोपण करावे?  वृक्षारोपण करताना जागा योग्य पद्धतीने निवडणे गरजचे आहे़ पारंपारिक झाडे फांदी पद्धतीने, कलम पद्धतीने किंवा साध्या पद्धतीने लावली तरी चालतात़ छोटे, मध्यम आणि उंच वाढणारी झाडे लावावीत़ झाड निवडताना ते आपल्या भागात वाढणारे असावे़ डोंगरावर मोठी झाडे जगत नाहीत़ तेव्हा छोटी झुडपे लावली पाहिजेत़ ही झुडपे माती धरून ठेवतात आणि झुडपे वाढल्यानंतर मोठी झाडे या भागात लावल्यास वनराई वाढण्यास मदत होऊ शकते.  नदी-नाल्यांच्या परिसरात वेडी बाभळ, इंगन बेट, हिवरी ही झाडे लावावीत.

संवर्धनाची जबाबदारी देणे गरजेचेशहरी भागात महापालिकेच्या मालकीच्या मोकळया जागा झाडे लावण्यासाठी निवडाव्यात़ त्या ठिकाणी सर्व प्रकारची झाडे लावून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी एखाद्या संस्थेवर दिल्यास झाडे जगू शकतात़ त्यांचे योग्य पद्धतीने संवर्धनही होऊ शकेल़ वृक्ष लागवड मोहिमेवर मोठा खर्च होतो़ मात्र ही झाडे टिकत नाहीत़ तेव्हा एक झाड लावण्यासाठी येणारा खर्च आणि त्याच्या संगोपनाचे मानधन थेट नागरिकांना दिले तर वृक्षसंवर्धन होऊ शकते़

टॅग्स :parabhaniपरभणीNatureनिसर्गRainपाऊस