शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

डोंगरांवर एकात्मिक वृक्ष लागवड करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 18:03 IST

कमी पाण्यात, कमी जागेत आणि लवकर वाढणारी पारंपारिक झाडे लावण्यावर नागरिकांनी भर दिला पाहिजे़

- प्रसाद आर्वीकर

पावसाळा आला की वृक्ष लागवड  मोहिमा सुरू होतात़ मात्र ही झाडे टिकत नाहीत आणि पूर्वीसारखीच परिस्थिती पुन्हा निर्माण होते़ तेव्हा वृक्ष लागवड करताना काय काळजी, कोणती झाडे कोणत्या ठिकाणी लावावीत आणि पर्यावरण संवर्धनासाठी नेमक्या कशा पद्धतीने वृक्षारोपण करावे, याविषयी येथील तज्ज्ञ प्रा. डॉ. सुनील मोडक यांच्याशी साधलेला संवाद... 

वृक्षारोपण करण्यासाठी कोणत्या जागा निवडाव्यात?वृक्षारोपण करण्यासाठी शक्य तो शासकीय मोकळ्या जागा, माळरान आणि डोंगरी भाग निवडला पाहिजे़ आपल्या भागात येणारी खैर, बाभूळ, पळस, बिबा, विलायती चिंच, कोंदन, वड, पिंपळ, फणस ही झाडे लावण्यास प्राधान्य द्यावे़ शहराबाहेर रस्त्याच्याकडेला मोठी उंच वाढणारी झाडे लावावीत़ 

कशा पद्धतीने वृक्षारोपण करावे?  वृक्षारोपण करताना जागा योग्य पद्धतीने निवडणे गरजचे आहे़ पारंपारिक झाडे फांदी पद्धतीने, कलम पद्धतीने किंवा साध्या पद्धतीने लावली तरी चालतात़ छोटे, मध्यम आणि उंच वाढणारी झाडे लावावीत़ झाड निवडताना ते आपल्या भागात वाढणारे असावे़ डोंगरावर मोठी झाडे जगत नाहीत़ तेव्हा छोटी झुडपे लावली पाहिजेत़ ही झुडपे माती धरून ठेवतात आणि झुडपे वाढल्यानंतर मोठी झाडे या भागात लावल्यास वनराई वाढण्यास मदत होऊ शकते.  नदी-नाल्यांच्या परिसरात वेडी बाभळ, इंगन बेट, हिवरी ही झाडे लावावीत.

संवर्धनाची जबाबदारी देणे गरजेचेशहरी भागात महापालिकेच्या मालकीच्या मोकळया जागा झाडे लावण्यासाठी निवडाव्यात़ त्या ठिकाणी सर्व प्रकारची झाडे लावून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी एखाद्या संस्थेवर दिल्यास झाडे जगू शकतात़ त्यांचे योग्य पद्धतीने संवर्धनही होऊ शकेल़ वृक्ष लागवड मोहिमेवर मोठा खर्च होतो़ मात्र ही झाडे टिकत नाहीत़ तेव्हा एक झाड लावण्यासाठी येणारा खर्च आणि त्याच्या संगोपनाचे मानधन थेट नागरिकांना दिले तर वृक्षसंवर्धन होऊ शकते़

टॅग्स :parabhaniपरभणीNatureनिसर्गRainपाऊस