शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

'जलजीवन'ला निधी नाही;हलगी वाजवून काम बंदचा कंत्राटदारांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 17:50 IST

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्हामध्ये ६५० नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामांना २०२१-२२ या एकाच वर्षात आदेश दिले होते.

हिंगोली : जल जीवन मिशनच्या कामांना निधी उपलब्ध झाला नाही तर १७ फेब्रुवारीपासून काम बंद केले जाईल, असा इशरा जिल्हाभरात जल जीवन मिशनचे काम करणाऱ्या कंत्राटदारांनी प्रशासनाला दिला आहे.

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्हामध्ये ६५० नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामांना २०२१-२२ या एकाच वर्षात आदेश दिले होते. जिल्ह्यात कंत्राटदारांची संख्या अपुरी असल्याने एका कंत्राटदारास अनेक योजनांची कामे विभागा मार्फत वाटून देण्यात आली. शिवाय मजूर, मिस्त्री यांची संख्याही कमी असल्याने कामे वेळेत होऊ शकली नाहीत. याबाबत माहीत असतानाही प्रशासनाने कामे वेळेत करावीत म्हणून कंत्राटदारांना नोटीस बजावल्या. कंत्रांतदारांनीही अनेक गावांमध्ये योजनेचे कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले; मात्र आठ महिन्यांपासून देयक अदा करण्यासाठी विभागाकडे निधी उपलब्ध नाही. त्यामुळे कंत्राटदारांची उपासमार होत आहे. योजनेच्या उद्भव विहिरीला पाणी न लागल्यामुळे अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा सुरू करता आला नाही. याबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी सक्षम निर्णय घेतला नाही. तेव्हा जल जीवन मिशनच्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा १७ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सुधारित अंदाजपत्रकांची नामुष्की

त्रयस्थ कंपनीने चुकीचा सर्वे करून अंदाजपत्रके बनविली. त्यामुळे ६५० गावांपैकी ३५० पेक्षा अधिक गावांमध्ये सुधारित अंदाजपत्रक तयार करावे लागत आहे. एक वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला तरीही ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने एकाही सुधारित अंदाजपत्रकास शासनाकडून मंजुरी घेतली नाही. त्याचाही फटका कंत्राटदारांना सहन करावा लागत आहे.

प्रशासनाला दिले निवेदनमंगळवारी हलगी वाजवत कंत्राटदार जिल्हा परिषदेत दाखल झाले. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. यावेळी संतोष घुगे, अविनाश पानपट्टे, संदीप पतंगे, सुरेश शेळके, अनंत गिरी, नामदेव कोरडे, विष्णू जगताप, ज्ञानेश्वर गरड, दीपक जयस्वाल, भागवत भोयर, मनोज माळोदे, गजानन नागरे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलन