शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

'जलजीवन'ला निधी नाही;हलगी वाजवून काम बंदचा कंत्राटदारांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 17:50 IST

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्हामध्ये ६५० नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामांना २०२१-२२ या एकाच वर्षात आदेश दिले होते.

हिंगोली : जल जीवन मिशनच्या कामांना निधी उपलब्ध झाला नाही तर १७ फेब्रुवारीपासून काम बंद केले जाईल, असा इशरा जिल्हाभरात जल जीवन मिशनचे काम करणाऱ्या कंत्राटदारांनी प्रशासनाला दिला आहे.

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्हामध्ये ६५० नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामांना २०२१-२२ या एकाच वर्षात आदेश दिले होते. जिल्ह्यात कंत्राटदारांची संख्या अपुरी असल्याने एका कंत्राटदारास अनेक योजनांची कामे विभागा मार्फत वाटून देण्यात आली. शिवाय मजूर, मिस्त्री यांची संख्याही कमी असल्याने कामे वेळेत होऊ शकली नाहीत. याबाबत माहीत असतानाही प्रशासनाने कामे वेळेत करावीत म्हणून कंत्राटदारांना नोटीस बजावल्या. कंत्रांतदारांनीही अनेक गावांमध्ये योजनेचे कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले; मात्र आठ महिन्यांपासून देयक अदा करण्यासाठी विभागाकडे निधी उपलब्ध नाही. त्यामुळे कंत्राटदारांची उपासमार होत आहे. योजनेच्या उद्भव विहिरीला पाणी न लागल्यामुळे अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा सुरू करता आला नाही. याबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी सक्षम निर्णय घेतला नाही. तेव्हा जल जीवन मिशनच्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा १७ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सुधारित अंदाजपत्रकांची नामुष्की

त्रयस्थ कंपनीने चुकीचा सर्वे करून अंदाजपत्रके बनविली. त्यामुळे ६५० गावांपैकी ३५० पेक्षा अधिक गावांमध्ये सुधारित अंदाजपत्रक तयार करावे लागत आहे. एक वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला तरीही ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने एकाही सुधारित अंदाजपत्रकास शासनाकडून मंजुरी घेतली नाही. त्याचाही फटका कंत्राटदारांना सहन करावा लागत आहे.

प्रशासनाला दिले निवेदनमंगळवारी हलगी वाजवत कंत्राटदार जिल्हा परिषदेत दाखल झाले. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. यावेळी संतोष घुगे, अविनाश पानपट्टे, संदीप पतंगे, सुरेश शेळके, अनंत गिरी, नामदेव कोरडे, विष्णू जगताप, ज्ञानेश्वर गरड, दीपक जयस्वाल, भागवत भोयर, मनोज माळोदे, गजानन नागरे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलन