शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

भरधाव ट्रक थेट रुळावर आला, चालकाच्या प्रसंगावधानाने १०० मीटर अंतरावर थांबली रेल्वे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 18:23 IST

सारवाडी - कोडी रेल्वे पटरीवरील घटना; ट्रक चालकाने केले पलायन

- प्रमोद साळवेगंगाखेड (जि.परभणी) : मुंबईहून नांदेडकडे निघालेली तपोवन एक्सप्रेस रेल्वे क्रं १७६१७ जालन्याच्या पुढे सारवाडी - कोडी शिवारात आली असता अचानक मालवाहतूक ट्रक क्रं (एमएच- २१ डी- ९२७५) रेल्वे पटरीवर येऊन थांबला. गोंधळलेल्या ट्रक चालकाने पलायन केले. रेल्वे चालकाने मात्र समयसूचकता व प्रसंगावधान दाखवत ट्रकपासून १०० मीटर अंतरावर तातडीचे ब्रेक लावल्याने रेल्वे अपघाताची मोठी दुर्घटना टळली. शुक्रवारी (ता.३१) रोजी दुपारी ३ वाजता ही घटना घडली. सुमारे ४० ते ४५ मिनिटे या प्रकारामुळे रेल्वे वाहतूक खोळंबली होती. दरम्यान ट्रक चालकाने पलायन केल्याची माहिती आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी, मुंबईहून नांदेडकडे निघालेली तपोवन एक्सप्रेस दुपारी ३ वाजता जालन्याच्या पुढे सारवाडी- कोडी शिवारात येताच समोर मालवाहतूक ट्रक एन रेल्वे पटरीवर येऊन थांबल्याचे रेल्वे चालकाच्या निदर्शनास आले. घटनेचे गांभीर्य ओळखून समयसुचकतेने प्रसंगावधान साधत रेल्वे चालकाने १०० मीटर अंतरावर ब्रेक केले. घाबरलेल्या ट्रक चालकाने तत्काळ पलायन केले.

दरम्यान, रेल्वे चालकाने मात्र परिस्थिती नियंत्रणात आणत रेल्वे अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देऊन उपस्थित प्रवाशांची मदत घेतली. संपूर्ण परिस्थिती निवळण्यासाठी सुमारे ४५ मिनिटे लागल्याची माहिती आहे. ट्रक चालकाची अक्षम्य चूक शेकडो रेल्वे प्रवाशांच्या जीवावर बेतली असती. मात्र, रेल्वे चालकाने दाखवलेल्या हिमतीने दुर्घटना टळल्याची प्रत्यक्षदर्शी प्रवासी, सपोउपनिरीक्षक प्रदीप हीरक यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली.

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघातparabhaniपरभणी