शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

ठाणे रुग्णालयात मृत्यू प्रकरणी मंत्री तानाजी सावंतांनी राजीनामा द्यावा; खासदार जाधवांची मागणी

By ज्ञानेश्वर भाले | Published: August 16, 2023 5:18 PM

तीन दिवसापूर्वी झालेल्या या दुर्दैवी घटनेने पूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे.

परभणी : ठाण्यातील मनपा रुग्णालयात एकाच रात्री १८ रुग्णांचा मृत्यू होतो, हे बाब दुर्दैवी आहे. त्यामुळे संबंधित घटनेचे गांभीर्य ओळखून आरोग्य मंत्री तथा परभणीचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना मंगळवारी केली. या घटनेत प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि सरकारचे दुर्लक्ष झाल्याने संबंधित रुग्णांना आपला जीव गमावा लागला असा आरोप त्यांनी यावेळी केला.

तीन दिवसापूर्वी झालेल्या या दुर्दैवी घटनेने पूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. परंतु सरकार पातळीवर याबाबत ठोस भूमिका घेतली जात नसल्याचे पुढे येत आहे. परिणामी यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांसह आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यावर या घटनेचे नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा. आम्ही घरात बसणारे सरकार अन् मंत्री नाही, असे म्हणून महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरणाऱ्या विरोधकांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारायला हवी, असे मत खासदार जाधव यांनी व्यक्त केले. कोरोना काळात सुद्धा अशी गंभीर स्थिती कधी उद्भवली नाही, महाविकास आघाडी सरकारने सर्व परिस्थिती योग्य रीतीने हाताळून नागरिकांचे जीव वाचवले. परंतु आताचे सरकार हे नागरिकांचे जीव घेणारे ठरत असल्याचा आरोप जाधव यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केला.--- 

टॅग्स :Sanjay Jadhavसंजय जाधवTanaji Sawantतानाजी सावंतparabhaniपरभणी