शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

ठाणे रुग्णालयात मृत्यू प्रकरणी मंत्री तानाजी सावंतांनी राजीनामा द्यावा; खासदार जाधवांची मागणी

By ज्ञानेश्वर भाले | Updated: August 16, 2023 17:20 IST

तीन दिवसापूर्वी झालेल्या या दुर्दैवी घटनेने पूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे.

परभणी : ठाण्यातील मनपा रुग्णालयात एकाच रात्री १८ रुग्णांचा मृत्यू होतो, हे बाब दुर्दैवी आहे. त्यामुळे संबंधित घटनेचे गांभीर्य ओळखून आरोग्य मंत्री तथा परभणीचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना मंगळवारी केली. या घटनेत प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि सरकारचे दुर्लक्ष झाल्याने संबंधित रुग्णांना आपला जीव गमावा लागला असा आरोप त्यांनी यावेळी केला.

तीन दिवसापूर्वी झालेल्या या दुर्दैवी घटनेने पूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. परंतु सरकार पातळीवर याबाबत ठोस भूमिका घेतली जात नसल्याचे पुढे येत आहे. परिणामी यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांसह आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यावर या घटनेचे नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा. आम्ही घरात बसणारे सरकार अन् मंत्री नाही, असे म्हणून महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरणाऱ्या विरोधकांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारायला हवी, असे मत खासदार जाधव यांनी व्यक्त केले. कोरोना काळात सुद्धा अशी गंभीर स्थिती कधी उद्भवली नाही, महाविकास आघाडी सरकारने सर्व परिस्थिती योग्य रीतीने हाताळून नागरिकांचे जीव वाचवले. परंतु आताचे सरकार हे नागरिकांचे जीव घेणारे ठरत असल्याचा आरोप जाधव यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केला.--- 

टॅग्स :Sanjay Jadhavसंजय जाधवTanaji Sawantतानाजी सावंतparabhaniपरभणी