शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

ठाणे रुग्णालयात मृत्यू प्रकरणी मंत्री तानाजी सावंतांनी राजीनामा द्यावा; खासदार जाधवांची मागणी

By ज्ञानेश्वर भाले | Updated: August 16, 2023 17:20 IST

तीन दिवसापूर्वी झालेल्या या दुर्दैवी घटनेने पूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे.

परभणी : ठाण्यातील मनपा रुग्णालयात एकाच रात्री १८ रुग्णांचा मृत्यू होतो, हे बाब दुर्दैवी आहे. त्यामुळे संबंधित घटनेचे गांभीर्य ओळखून आरोग्य मंत्री तथा परभणीचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना मंगळवारी केली. या घटनेत प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि सरकारचे दुर्लक्ष झाल्याने संबंधित रुग्णांना आपला जीव गमावा लागला असा आरोप त्यांनी यावेळी केला.

तीन दिवसापूर्वी झालेल्या या दुर्दैवी घटनेने पूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. परंतु सरकार पातळीवर याबाबत ठोस भूमिका घेतली जात नसल्याचे पुढे येत आहे. परिणामी यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांसह आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यावर या घटनेचे नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा. आम्ही घरात बसणारे सरकार अन् मंत्री नाही, असे म्हणून महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरणाऱ्या विरोधकांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारायला हवी, असे मत खासदार जाधव यांनी व्यक्त केले. कोरोना काळात सुद्धा अशी गंभीर स्थिती कधी उद्भवली नाही, महाविकास आघाडी सरकारने सर्व परिस्थिती योग्य रीतीने हाताळून नागरिकांचे जीव वाचवले. परंतु आताचे सरकार हे नागरिकांचे जीव घेणारे ठरत असल्याचा आरोप जाधव यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केला.--- 

टॅग्स :Sanjay Jadhavसंजय जाधवTanaji Sawantतानाजी सावंतparabhaniपरभणी