शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

सांग सांग भोलेनाथ पाऊस कधी पडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:22 IST

हवामान खात्याच्या अंदाजानुसार जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. या पावसाच्या भरवशावर जिल्ह्यातील तीन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण ...

हवामान खात्याच्या अंदाजानुसार जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. या पावसाच्या भरवशावर जिल्ह्यातील तीन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या. यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन ही नगदी पिके घेतली आहेत. पेरणी झालेली पिके आता उगवले असून, कवळ्या पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. याच वेळी पावसाने दगा दिला असून, दहा दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे ही कोवळी पिके धरू लागली असून, मुळाजवळील ओलावा कमी होत असल्याने ही पिके कोमजून जात आहेत. अशावेळी कोळपणी करून या पिकांना जगण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकऱ्यांकडून होत आहे. मात्र ७७ टक्केहून अधिक पेरणी झालेल्या पिकांना पावसाचे नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे चार दिवसांत पाऊस झाले नाही, तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे सांग सांग भोलेनाथ पाऊस कधी पडेल काय असे म्हणत शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.

......तर दुबार पेरणी

जिल्ह्यात यावर्षी सर्वाधिक सोयाबीनची पेरणी झाली असून त्यापाठोपाठ कापसाची लागवड करण्यात आली आहे. मात्र दहा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने या पिकांना आता पावसाची गरज आहे. मात्र चार दिवसात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही तर जवळपास ७७ टक्के क्षेत्रावर झालेल्या पेरण्या दुबार करण्याची वेळ जिल्ह्यातील बळीराजा वर येणार आहे.

.......सोयाबीनचा पेरा वाढला

मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस पिकाकडे कानाडोळा करत शेतकरी सोयाबीन पिकाची सर्वाधिक पेरणी करत आहेत. या वर्षीही ५ लाख १७ हजार १४२ हेक्‍टर क्षेत्रापैकी १ लाख ८५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची सर्वाधिक, तर दीड लाख हेक्‍टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी सर्वाधिक सोयाबीनचा पेरा जिल्ह्यात असल्याचे दिसून येत आहे.

........देव अशी परीक्षा दरवर्षी का घेतो

मागील वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने कापूस व सोयाबीन ही पिके हातची गेली. आता माझ्या बारा एकरमध्ये उसनवारी करून कापूस व सोयाबीनची पेरणी केली आहे. मात्र या पिकांना सध्या पावसाची आवश्यकता असताना पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे दरवर्षी देव शेतकऱ्यांची का परीक्षा घेतो? असा प्रश्न मनात निर्माण झाला आहे.

- होनाजी बनसोडे

दोन वर्षांपासून नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या करत असताना यावर्षी जून महिन्यातच समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे या पावसाच्या भरोशावर पाच चक्करमध्ये सोयाबीनची पेरणी केली आहे. मात्र दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे ही कवळी पिके करपून जात आहेत. चार दिवसांत पाऊस नाही झाला तर दुबार पेरणी करण्याची वेळ आमच्यावर येणार आहे.

लक्ष्मण वैद्य