शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

सदाभाऊ खोत यांच्या गाडीसमोर टोमॅटो फेकून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केला निषेध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 16:00 IST

टोमॅटोलाही अत्यल्प भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे़

परभणी : दुष्काळी परिस्थितीमध्ये टोमॅटोला किरकोळ भाव मिळत असल्याने आणि शासनाच्या उपाययोजना ठप्प असल्याने बुधवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीसमोर टोमॅटो फेकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला़ शहरातील बसस्थानकाजवळील उड्डाणपूल भागात दुपारी साधारणत: २़४५ च्या सुमारास ही घटना घडली़ 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत बुधवारी परभणी येथे आले होते़ विद्यापीठातील हा समारंभ आटोपल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली़ या बैठकीनंतर खोत यांच्या वाहनांचा ताफा स्टेशन रोड, बसस्थानक मार्गाने पाथरीकडे निघाला़ यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, दिगांबर पवार, केशव आरमळ, भास्कर खटींग, मुंजाभाऊ लोढे, उस्मान पठाण आदींसह इतर कार्यकर्ते उड्डाणपुलाजवळ सुरुवातीपासूनच थांबले होते.

परभणी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून, रबीचा हंगाम वाया गेला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर येणारा भाजीपाला पिकविला़ मात्र भाजीपाल्यालाही भाव मिळत नाही़ टोमॅटोलाही अत्यल्प भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे़ या शिवाय जिल्ह्यात दुष्काळी योजनांना सुरुवात झाली नाही़ या कारणांवरून कृषी राज्यमंत्री  आणि शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी कार्यकर्त्यांनी उड्डाणपुलालगत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या वाहनासमोर टोमॅटो फेकून रोष व्यक्त केला़ यावेळी पोलीस बंदोबस्तही होता़ परंतु, अचानक झालेल्या या प्रकारामुळे काहीसा गोंधळ उडाला आणि त्याच परिस्थिती खोत यांच्या वाहनांचा ताफा पुढे निघून गेला़

टॅग्स :agitationआंदोलनSadabhau Khotसदाभाउ खोत agricultureशेतीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना